Homeएनसर्कलसरकारी निवृत्तीवेतनधारकांचे जीवन...

सरकारी निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ करणारे ‘जीवन प्रमाण ॲप’!

भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत येणारा  निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने मुंबईत एसबीआय अणुशक्ती नगर शाखा येथे  निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

अंबरनाथमध्येही अशाच प्रकारचे एक दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जीवन प्रमाणपत्रे डिजिटल सादर करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान वापरणाऱ्या जीवन प्रमाण ॲपची निवृत्तीवेतनधारकांना ओळख करून देणे हा या शिबिरांचा उद्देश होता.

हे शिबीर म्हणजे, केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र  प्रचारासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा भाग आहे. 1 ऑक्टोबर 2022पासून 61,00,000हून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर केली आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नोव्हेंबर 2021मध्ये फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा प्रारंभ केला होता.

शिबिरात, एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्वयंसेवकांनी निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून जीवन प्रमाण ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले.

पूर्वी, वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना प्रत्यक्ष स्वरूपात जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकांबाहेर तासनतास रांगेत उभे राहावे लागे. आता, ते त्यांच्या घरून आरामात एका बटणाच्या क्लिकवर त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर करू शकतात. ‘जीवन प्रमाण’ ही निवृत्तीवेतनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे निवृत्तीवेतनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

ॲप डाउनलोड करण्यासाठी:

Jeevan Pramaan :: Life Certificate for Pensioners ** DeitY ** Government of India

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content