Homeपब्लिक फिगरघटनात्मक पदावरची व्यक्ती...

घटनात्मक पदावरची व्यक्ती बेजबाबदारपणे वागते हे चिंताजनक!

घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती “आपल्या अर्थव्यवस्थेचा नाश करण्याच्या उद्देशाने प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या नरेटीव्हला बळ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे आवाहन करते ” ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कालकेले.

दिल्लीतील राष्ट्रीय विधि विद्यापीठात (एनएलयू) आयपी लॉ आणि मॅनेजमेंटमधील जॉईंट मास्टर्स / एलएलएम पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीला संबोधित करताना ते बोलत होते. संस्थेचे अधिकारक्षेत्र भारतीय राज्यघटनेने परिभाषित केले आहे. ते कायदेमंडळ असो किंवा कार्यपालिका, किंवा  न्यायपालिका. प्रत्येकाचे अधिकारक्षेत्र ठरवलेले आहे. जगभरात पाहा. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालय, ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालय पाहा. एकदा तरी स्वतःहून हस्तक्षेप केला आहे का? राज्यघटनेत दिलेल्या तरतूदीच्या पलीकडे उपाय निर्माण झाला आहे का? राज्यघटनेने मूळ अधिकारक्षेत्र, अपील अधिकारक्षेत्र प्रदान केले आहे. तसेच पुनरावलोकनाची तरतूददेखील केली आहे, असे ते म्हणाले.

आपल्याकडे क्युरेटीव्ह याचिका आहे! घटनात्मक पदावर असलेल्या एका व्यक्तीने, गेल्याच आठवड्यात माध्यमांत जाहीर केले की, आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हेतू असलेल्या एका खोट्या नरेटीव्हला बळ देण्यासाठी स्वतःहून दखल घेण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली. ही बाब चिंताजनक आहे. राष्ट्रहितापेक्षा पक्षपाती किंवा स्वार्थाला प्राधान्य देणाऱ्या शक्तींना प्रभावहीन करण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले आणि अशा कृतींमुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते यावर भर दिला, असे त्यांनी सांगितले.

भारत ही बौद्धिक संपदेची सोन्याची खाण आहे. वेद, प्राचीन धर्मग्रंथ हे भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा पाया आहे. भारताच्या बौद्धिक खजिन्याची ही प्रमुख उदाहरणे आहेत. प्रत्येकाने वेद त्यांच्या भौतिक स्वरूपात आत्मसात करावे, असे आवाहनही धनखड यांनी केले.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content