Homeपब्लिक फिगरया सरकारचा योग्य...

या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम?

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आपण, आमच्या उमेदवाराला निवडून द्या. या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करू, असे म्हटले होते. आणि आज पुन्हा सांगतो की, योग्य वेळी महाराष्ट्रातल्या या सरकारचा करेक्ट कार्यक्रम होईल. काय घडणार आहे हे आपल्याही लक्षात येईल. पण, आता ती वेळ नाही. आता कोरोनाविरूदधच्या लढाईत आम्ही सरकारला मदत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर समाधान व्यक्त करताना त्यांनी यासाठी तेथील जनतेचे तसेच पक्षाच्या विविध नेत्यांचे आभार मनले. गेल्या दीड वर्षांत या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारी कारभारामुळे जनता चिडली होती. वीजजोडण्या तोडण्याची कारवाई, कोरोना काळात बारा बलुतेदारांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण, यामुळे जनता वैतागली होती आणि त्यांनी आपला कौल दिला. सत्तेतल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या तीनही पक्षांनी एकत्रितपणे लढत दिली. सरकारी यंत्रणा, पैसा यांचा गैरवापर केला. परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असेही ते म्हणाले.

बंगालमध्ये तीनवरून इथपर्यंत

बंगालमध्ये आम्ही तीन जागांवरून इथपर्यंत आलो. या निवडणुकीत काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष सपाचट झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला झाला. आतापर्यंत तेथे काँग्रेस व कम्युनिस्टांचाच बोलबाला होता. आता बंगाल काँग्रेस व कम्युनिस्टमुक्त झाला आहे. महाराष्ट्रातली जनताही जिगरबाज होती म्हणून त्यांनी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपाला निवडून दिले होते. त्यासोबत तुम्हालाही दिले. पण तुम्ही विश्वासघात केला आणि ज्यांना नाकारले त्यांच्यासोबत सत्तेत बसला. कोरोनाची काय स्थिती आहे आणि आपण काय करतो आहोत, याची खरे त्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

आसाममध्ये आम्ही सत्ता राखली. पुद्दूचेरीत सत्ता मिळवली. बंगालमध्ये तीन जागांवरून इथपर्यंत आलो. तामिळनाडूत आमचा सफाया होणार असे म्हटले जात होते तेथे आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. बेळगावीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मते फोडण्यासाठीच उभे केले गेले हे आता अधोरेखित झाले आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content