Tuesday, March 11, 2025
Homeपब्लिक फिगरया सरकारचा योग्य...

या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम?

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आपण, आमच्या उमेदवाराला निवडून द्या. या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करू, असे म्हटले होते. आणि आज पुन्हा सांगतो की, योग्य वेळी महाराष्ट्रातल्या या सरकारचा करेक्ट कार्यक्रम होईल. काय घडणार आहे हे आपल्याही लक्षात येईल. पण, आता ती वेळ नाही. आता कोरोनाविरूदधच्या लढाईत आम्ही सरकारला मदत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर समाधान व्यक्त करताना त्यांनी यासाठी तेथील जनतेचे तसेच पक्षाच्या विविध नेत्यांचे आभार मनले. गेल्या दीड वर्षांत या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारी कारभारामुळे जनता चिडली होती. वीजजोडण्या तोडण्याची कारवाई, कोरोना काळात बारा बलुतेदारांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण, यामुळे जनता वैतागली होती आणि त्यांनी आपला कौल दिला. सत्तेतल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या तीनही पक्षांनी एकत्रितपणे लढत दिली. सरकारी यंत्रणा, पैसा यांचा गैरवापर केला. परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असेही ते म्हणाले.

बंगालमध्ये तीनवरून इथपर्यंत

बंगालमध्ये आम्ही तीन जागांवरून इथपर्यंत आलो. या निवडणुकीत काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष सपाचट झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला झाला. आतापर्यंत तेथे काँग्रेस व कम्युनिस्टांचाच बोलबाला होता. आता बंगाल काँग्रेस व कम्युनिस्टमुक्त झाला आहे. महाराष्ट्रातली जनताही जिगरबाज होती म्हणून त्यांनी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपाला निवडून दिले होते. त्यासोबत तुम्हालाही दिले. पण तुम्ही विश्वासघात केला आणि ज्यांना नाकारले त्यांच्यासोबत सत्तेत बसला. कोरोनाची काय स्थिती आहे आणि आपण काय करतो आहोत, याची खरे त्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

आसाममध्ये आम्ही सत्ता राखली. पुद्दूचेरीत सत्ता मिळवली. बंगालमध्ये तीन जागांवरून इथपर्यंत आलो. तामिळनाडूत आमचा सफाया होणार असे म्हटले जात होते तेथे आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. बेळगावीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मते फोडण्यासाठीच उभे केले गेले हे आता अधोरेखित झाले आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content