Homeपब्लिक फिगरशिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून...

शिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून अधिकाराचा गैरवापर?

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस दिवसेंदिवस वाढत असून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मंत्री सुभाष देसाई यांच्यावरच निशाणा साधला आहे. देसाई यांच्या अखत्यारीतील खनिकर्म महामंडळाच्या कारभारात पदाचा गैरवापर झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

याबाबत पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एक पत्र पाठवून ही बाब निदर्शनाला आणली आहे. मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी काँग्रेस याकडे किती लक्ष देते आणि काँग्रेस हा मुद्दा किती ताणते यावर ही धुसफूस किती प्रमाणात ताणली जाईल हे स्पष्ट होईल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना २१ मे २०२१ रोजीच पत्र पाठवले होते. परंतु या दोघांपैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नानांनी २३ जून २०२१ पुन्हा एक पत्र पाठवून याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांच्याकडून हे पत्र प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे कळते. नागपूरच्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, पदाचा अनधिकृत वापर करून टेंडरचे नियम डावलून कोळसा पुरवठा व वॉशिंगचे काम महाजनकोसाठी पात्र ठरवून, देकारपत्र दिल्याचा आरोप पटोले यांनी या पत्रात केला आहे.

रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर, ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून या कंपनीचे कुठलेही नेटवर्क नाही. टर्नओव्हर नाही. सेक्युरिटी क्लिअरन्स नाही. कोळसा वॉशिंग करण्याचा काहीही अनुभव नाही. त्यांनी ज्या कंपनीबरोबर संयुक्त भागिदारी केली आहे, ती कंपनी काळ्या यादीत टाकण्यात आली आहे. रूखमाई कंपनीने निविदेच्या कोणत्याही अटी व शर्तींची पूर्तता केलेली नाही. तरी या कंपनीला पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

ही कंपनी महाजनकोला वेळेवर कोळसा पुरवू शकत नाही. त्याचा परिणाम महाजनकोच्या वीज उत्पादनावर होईल. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content