Homeपब्लिक फिगरशिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून...

शिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून अधिकाराचा गैरवापर?

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस दिवसेंदिवस वाढत असून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मंत्री सुभाष देसाई यांच्यावरच निशाणा साधला आहे. देसाई यांच्या अखत्यारीतील खनिकर्म महामंडळाच्या कारभारात पदाचा गैरवापर झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

याबाबत पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एक पत्र पाठवून ही बाब निदर्शनाला आणली आहे. मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी काँग्रेस याकडे किती लक्ष देते आणि काँग्रेस हा मुद्दा किती ताणते यावर ही धुसफूस किती प्रमाणात ताणली जाईल हे स्पष्ट होईल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना २१ मे २०२१ रोजीच पत्र पाठवले होते. परंतु या दोघांपैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नानांनी २३ जून २०२१ पुन्हा एक पत्र पाठवून याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांच्याकडून हे पत्र प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे कळते. नागपूरच्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, पदाचा अनधिकृत वापर करून टेंडरचे नियम डावलून कोळसा पुरवठा व वॉशिंगचे काम महाजनकोसाठी पात्र ठरवून, देकारपत्र दिल्याचा आरोप पटोले यांनी या पत्रात केला आहे.

रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर, ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून या कंपनीचे कुठलेही नेटवर्क नाही. टर्नओव्हर नाही. सेक्युरिटी क्लिअरन्स नाही. कोळसा वॉशिंग करण्याचा काहीही अनुभव नाही. त्यांनी ज्या कंपनीबरोबर संयुक्त भागिदारी केली आहे, ती कंपनी काळ्या यादीत टाकण्यात आली आहे. रूखमाई कंपनीने निविदेच्या कोणत्याही अटी व शर्तींची पूर्तता केलेली नाही. तरी या कंपनीला पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

ही कंपनी महाजनकोला वेळेवर कोळसा पुरवू शकत नाही. त्याचा परिणाम महाजनकोच्या वीज उत्पादनावर होईल. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content