Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्र्यांच्या वांझोट्या बैठकांमुळेच...

मुख्यमंत्र्यांच्या वांझोट्या बैठकांमुळेच राज्यात ओबीसी वंचित?

मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्याने महाराष्ट्रात ओबीसी समाजावर ही वेळ आली आहे. येत्या तीन महिन्यांत ओबीसी समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणाम भोगा, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

राज्यातल्या ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारने ओबीसी आरक्षण पुन्हा लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार नाहीत, असा निर्णय घेतला. सरकारच्या या भूमिकेवरही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. सरकारला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक झाली आहे.

आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका. लवकारत लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर ओबीसी, भटका, विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे भाजपाचे प्रदेश सरचिटणिस चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला निवडणूका घ्याव्या लागतात. पण, राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका पुढे ढकलू असे म्हणत, राज्यातील ओबीसी जमतेची दिशाभूल केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न आहे. आता तीन महिन्यात इम्पेरिकल डाटा गोळा करुन, ओबीसींना आरक्षण द्यावे. नाही तर राज्यातील ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि भाजपा या सरकारविरोधात तीव्र आंदोलन करणार, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

ओबीसींच्या मुळावर उठललेले हे प्रस्थापितांचे महाआघाडी सरकार आहे, हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यात कुठलेही राजकारण न करता आम्हीही त्यास पाठींबा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच याविषयीचे वारंवार संकेत दिले होते. आपले म्हणणे मांडले होते. पण हया प्रस्थापितांनी केंद्राकडे बोट दाखवत सेन्ससचा डेटा की इंपेरिकल डेटा असा वाद घातला. जर वेळ वाया न घालवता इंपेरिकल डेटा गोळा केला असता तर आणि त्वरित न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असती तर ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाले असते, असेही ते म्हणाले. आता उशिरा त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे कळून चुकले आहे आणि मान्यही केले की इंपेरिकल डेटाशिवाय आपल्याला हे ओबीसींचे राजकीय आरक्षण खेचून आणता येणार नाही. मात्र, आताही राज्य मागासवर्ग आयोगाला बसायला साधे ऑाफीस नाही. डेटा गोळा करण्यासाठी व त्याची शास्त्रशुद्ध मांडणी करण्यासाठी आपण कोणत्या एजन्सीला अपॅाईंट केले आहे का, असा सवालही बावनकुळे यांनी विचारला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content