Homeटॉप स्टोरीस्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे...

स्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे भवितव्य?

राज्यातल्या वाढत्या कोरोनाला थोपविण्यासाठी लॉकडाऊन लावणे अपरिहार्य असले तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता जास्तीतजास्त स्थलांतरीत वर्ग आपापल्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत लॉकडाऊन टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा राज्याच्या विविध शहरांमध्ये राज्यातील, परराज्यांतील कामगार, मजूर मोठ्या प्रमाणात राहतो. मागच्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हा वर्ग जे हाती लागेल ते घेऊन आपापल्या गावी निघाला होता. त्यावेळी रेल्वेसुद्धा बंद होती आणि रस्त्यावरून एसटीही धावत नव्हत्या. रोजगार बुडाल्याने त्यांना आपले घर गाठण्याशिवाय पर्यायही नव्हता. मात्र, जसजसा लॉकडाऊन सैल झाला तसतसा हा वर्ग पुन्हा आपल्या रोजगारासाठी शहरांमध्ये विसावला. आता कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी आणि विविध निर्बंध लावण्यात आले असले तरी रेल्वे आणि बस ही प्रवासाची अत्यंत महत्त्वाची साधने सुरू आहेत.

मागच्या खेपेला तासनतास पायपीट करणाऱ्या या मजुरांना केंद्र सरकारने विविध मार्गाने मदत केली होती. राज्य सरकारकडे याकरीता अन्नधान्य दिले होते. राज्याला विविध पॅकेजद्वारे मदतही मिळाली होती. त्याखेरीज विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, यावेळी अशी कोणतीही मदत दृष्टीक्षेपात दिसत नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर या लोकांसाठी करावा लागणारा खर्च शासनालाच सोसावा लागणार आहे. ही शक्यता ध्यानात घेऊन गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊन लावण्याचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्तीतजास्त मजूर, कामगार आपापल्या कुटुंबासह आपापल्या मुक्कामी पोहोचेल आणि नंतर त्यांना पोहोचविण्याची जबाबदारी सरकारला उचलावी लागणार नाही, असा हा सारा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासाठी बनविलेल्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सशीही दोनवेळा दीर्घ चर्चा केली. या चर्चेत त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किमान १५ ते २१ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा अशी शिफारस केली आहे. कोरोनामुळे वर्षभर भरडलेल्या लोकांनी लॉकडाऊनला केलेला विरोध आणि भारतीय जनता पार्टीने या वर्गाला दिलेला पाठिंबा लक्षात घेता आणि राज्याची डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था पाहता या लोकांसाठी कोणते पॅकेज जाहीर करता येईल, याची आखणी राज्य सरकार करत असल्याचे कळते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content