Homeपब्लिक फिगरअनिल परब यांचा...

अनिल परब यांचा दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट?

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून दापोली येथे बांधलेल्या अनधिकृत रिसॉर्टप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागविला जाईल, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांच्या नेतृत्त्वाखालील एका शिष्टमंडळाला दिले.

भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, आमदार राम कदम, मिहीर कोटेचा, राहुल नार्वेकर, मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, युवराज मोरे आणि सिद्धार्थ शर्मा यांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन अनिल परब यांचे बेकायदेशीर बांधकाम, सरकारी देस्तावेजात खाडखोड, अपारदर्शक आर्थिक व्यवहार यासंबंधी निवेदन व पुरावे दिले. त्यावेळी राज्यपालांनी हे आश्वासन दिले.

अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट, सीआरझेडच्या नियमांचा भंग, वन व पर्यावरणचे नुकसान, सरकारी दस्तावेजात खाडखोड व मंत्रीपदाच्या दुरुपयोगासंबंधी मला तक्रार व दस्तावेज मिळाले आहेत. यासंबंधी मी राज्याच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवणार आहे, असे राज्यपाल कोश्यारी या शिष्टमंडळाला म्हणाले.

अनिल परब

अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी विभास साठे यांच्याकडून १ कोटी रुपये देऊन मुरुड येथील ४२ गुंठे शेत जमीन विकत घेतली. खरेदीखताप्रमाणे ५ मे २०१७ला अनिल परब यांनी या जागेचा कब्जा घेतला. परंतु कधीही ही जागा स्वत:च्या नावावर केली नाही. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सहनिबंधक यांच्याकडे सदानंद कदम यांच्या नावाने खरेदीखत करून परब यांनी ही जागा परस्पर सदानंद कदम यांच्या नावाने केली. ४ वर्षे परब यांनी ही जागा “बेनामी” मिळकत म्हणून स्वत:कडे ठेवली व रिसॉर्ट बांधला, असा आरोप सोमैया यांनी केला.

कोरोना काळात परब यांनी अनधिकृतरित्या २२ डिलक्स खोल्यांचा ३ मजली रिसॉर्ट या जमिनीवर बांधला. किरीट सोमैया यांनी ६ मे २०२१ रोजी दापोली येथे जाऊन या अनधिकृत रिसॉर्टसंबंधी खुलासा केला. परब यांनी भ्रष्टाचाराचा पैसा वापरून ही बेनामी मिळकत विकसित केली आहे. या रिसॉर्टसाठी कोणतेही परवाने घेण्यात आलेले नाहीत. परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. सीआरझेडची अनुमती नाही. खोटे कागदपत्र दाखविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात दस्तावजात खाडाखोड करून आता हा रिसॉर्ट २०१९पूर्वीचा आहे असे अनिल परब यांनी घोषित केले, असेही सोमैया यांनी सांगितले.

अनिल परब यांनी ही जागा पुण्याचे विभास साठे यांच्याकडून विकत घेतली. सोमैया यांनी साठे यांच्याकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर हे स्पष्ट झाले आहे की, अनिल परब यांनी जागेचा ताबा घेतला त्यावेळी या शेतजमीनीवर एक फूटही बांधकाम नव्हते, झोपडेही नव्हते. यासंबंधीचे गुगल मॅप/अर्थचे नकाशेही राज्यपालांना भाजपाच्या शिष्टमंडळाने दाखविले.

राज्यपालांनी अनिल परब यांच्याविरुद्ध सीआरझेड भंग, अनधिकृत बांधकाम, बेनामी मिळकत, भ्रष्टाचाराचा पैसा वापरणे, मंत्रीपदाचा दुरुपयोग याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या व्यवहाराची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) करावी असा आग्रह भाजपाने केला आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content