Homeमाय व्हॉईसविश्वगुरूचे वैभव पुन्हा...

विश्वगुरूचे वैभव पुन्हा मिळवण्याकडे भारताची वाटचाल!

विश्वगुरू म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुण नेत्यांना भावी पिढ्यांसाठी असा एक मार्ग तयार करण्याचे आवाहन केले, जिथे आशा आकांक्षा आणि मनोधैर्य उंचावेल आणि त्याची प्रचिती आपल्या समृद्ध संस्कृतीची जपणूक करणाऱ्या समृद्ध भारतात दिसून येईल. आपण 2047च्या दिशेने वाटचाल करत असताना, स्वतः बद्दल विश्वास बाळगूया, कार्याला सुरुवात करूया, सहयोग वाढवूया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल घडवणारे बनण्याची आकांक्षा बाळगूया, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

जमशेदपूरमधील  एक्सएलआरआय–झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक आणि कृती दोन्हींमधून आर्थिक राष्ट्रवाद आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करून तरुणांमध्ये “स्वदेश”ची भावना पुन्हा रुजवण्याची अत्यावश्यक गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी उपराष्ट्रपतींनी स्वदेशचे अनेक फायदे स्पष्ट करून सांगितले यामध्ये परकीय चलनाचा साठा राखून ठेवण्यापासून ते उद्योजकतेला चालना देणे आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश होता. अपयशाच्या भीतीपासून सावधगिरी बाळगत स्वतःला विकासाविरोधी आणि वृद्धीविरोधी म्हणून घेणे अतिशय नुकसानकारक असल्याचे सांगत उपराष्ट्रपती यांनी नमूद केले की, भीतीपोटी एखाद्या कल्पनेचा पाठपुरावा करण्यापासून स्वतःला दूर ठेवणे हे केवळ स्वत:वरच अन्याय केल्यासारखे होत नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवतेवरही अन्याय होतो.

हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे की यशाची मोजणी ही केवळ बोजड पुस्तके वाचून किंवा उत्कृष्टतेचे शेरे घेऊन होते असे नाही तर सतत नवनवीन शिकण्याची उत्कटता जोपासणे आणि समोर येणाऱ्या आव्हानांवर आपण कशा प्रकारे  मात करू शकतो यामधूनही यशाची मोजणी होत असते असेही उपराष्ट्रपतीनी सांगितले.

Continue reading

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या...

‘मेट गाला’मध्ये झाली सर्वात वाईट पोशाखाचीच चर्चा!

एआय वधू येत आहे का? असा प्रश्न पडावा. कॅटी पेरीने आपला चेहरा रोबोटसारख्या दिसणाऱ्या चंदेरी मास्कने पूर्णपणे झाकला होता आणि त्यावर तिने खांद्याविना, मोठा चौकोनी गळा असलेला पांढरा रेशमी गाऊन परिधान केला होता. पांढऱ्या सॅटिन ऑपेरा ग्लोव्हज घालून तिने...
Skip to content