Homeबॅक पेजसमुद्रमार्गे भारतातील केळीची...

समुद्रमार्गे भारतातील केळीची पहिली खेप युरोपला रवाना!

भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून प्रायोगिक तत्त्वावर या खेपेच्या निर्यातीनिमित्त कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) महाराष्ट्रात पुण्याजवळ नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन केले. भारतीय केळ्यांना युरोपच्या बाजारपेठेत आणखी जास्त वाव मिळावा या उद्देशाने या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समुद्रमार्गे केळीची भारतातील पहिली खेप युरोपला रवाना करण्यात आली.

अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, आयएएस या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्रातून युरोपला केळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम म्हणजे भारतीय कृषी निर्यात क्षेत्रात पुढचे पाऊल टाकणारा संस्मरणीय क्षण ठरला. एकूण 19.50 मेट्रिक टन केळी (1080X18.14 प्रति खोका निव्वळ भार) अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या महाराष्ट्रातील निर्यातदाराकडून निर्यात करण्यात आली. महाराष्ट्रात मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि., वासुंदे, बारामती- कुरकुंभ रोड, दौंड, पुणे येथे या निर्यातदाराच्या पॅकहाऊसमधून ही केळी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून सागरी मार्गाने या केळ्यांची निर्यात केली जाईल. ही निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी अतिशय सुनियोजित पद्धतीने अपेडाकडून, महाराष्ट्रातील मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या निर्यातदार कंपनीला संपूर्ण पाठबळ देण्यात आले. भारताच्या केळी निर्यातीच्या क्षेत्रात यामुळे एका नव्या अध्यायाची सुरूवात झाली.

यावेळी अपेडाच्या दिल्लीतील मुख्यालयाच्या फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल डिव्हिजनच्या (FFV Division) महाव्यवस्थापक विनिता सुधांशू, मुंबईमधील प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख आणि उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, राज्य सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी, केळी निर्यातदार, प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी आणि आयएनआय फार्म्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

भारतीय कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वाव देण्यासाठी अपेडाची वचनबद्धता या ऐतिहासिक कार्यक्रमातून अधोरेखित झाली. अशा प्रकारे युरोपला प्रायोगिक तत्वावर केळी पाठवण्याचा हा प्रयत्न निर्यात क्षेत्रामधील एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी आणि युरोपीय बाजारपेठेतील भारताचे स्थान बळकट करण्यासाठी अपेडा अतिशय सक्रीय पद्धतीने हितधारकांसोबत काम करत आहे. 

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content