Homeन्यूज ॲट अ ग्लांसपोप फ्रान्सिस यांच्या...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहण्यासाठी तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. 22 आणि 23 एप्रिलला दोन दिवसांचा शोक पाळण्यात आला तसेच अंत्यसंस्काराच्या दिवशी म्हणजे उद्या एका दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळला जाईल. पोप फ्रांसिस हे एकविसाव्या शतकातील पोप आहेत. ते २६६वे पोप आहेत. ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम आणि पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर पोपपदी येणारे युरोपाबाहेरचे पहिले पुरुष आहेत. पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव होर्हे मारियो बेर्गोलियो होते. 17 डिसेंबर 1936 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 88व्या वर्षी 21 एप्रिल 2025 रोजी त्यांचे निधन झाले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content