Homeमुंबई स्पेशलकोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी...

कोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी आघाडीचे मौन

कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही इंडी आघाडीची मंडळी एक शब्दही काढत नाहीत. अशा बलात्काऱ्यांच्या, लव्ह जिहाद्यांच्या विरोधात लढण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्धार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले.

विशिष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित, विशिष्ट धर्माशी संबंधित बलात्कारींना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुलेआम पाठीशी घालत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन देण्याबाबत इंडी आघाडीने मौन बाळगले आहे, असे ते म्हणाले.

बलात्काऱ्यांना संरक्षण देऊन पश्चिम बंगालला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींंनी बलात्कारी राज्य केले आहे. वर्षोनवर्षे अशा बलात्काराच्या निंदनीय घटना पश्चिम बंगालमध्ये होत आहेत. मात्र या प्रकरणांत बलात्कारी

गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासंदर्भात इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांचे मौन बरेच काही सांगते. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात आवाज उठविणाऱ्या सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोपही शुक्ला यांनी केला.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राक्षसी बलात्कार केलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे वक्तव्य करतात, तर दुसरीकडे इंडी आघाडीला पीडित महिलेबाबत जरासुद्धा कणव नाही. विशिष्ट धर्माचे लोक अपराधी असल्यानंतर पीडितांना न्याय देण्याऐवजी ही मंडळी बलात्कारी, गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. इंडी आघाडी ही बलात्कारी बचाव आघाडी असून त्यांच्या मुस्लीम अपराध्यांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये रोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मविआ म्हणजे मजहबी, व्यभिचारी आणि अपराधी आघाडी असून या आघाडीचे उद्धव ठाकरे व अन्य नेते लव जिहाद करणाऱ्यांचे संरक्षक आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे दोघेही पीडित महिलांच्या बाजूने उभे न राहता मुस्लीम अपराधींना वाचवण्याचा हीन प्रयत्न करत आहेत, असेही शुक्ला म्हणाले.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content