Tuesday, March 11, 2025
Homeमुंबई स्पेशलकोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी...

कोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी आघाडीचे मौन

कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही इंडी आघाडीची मंडळी एक शब्दही काढत नाहीत. अशा बलात्काऱ्यांच्या, लव्ह जिहाद्यांच्या विरोधात लढण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्धार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले.

विशिष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित, विशिष्ट धर्माशी संबंधित बलात्कारींना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुलेआम पाठीशी घालत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन देण्याबाबत इंडी आघाडीने मौन बाळगले आहे, असे ते म्हणाले.

बलात्काऱ्यांना संरक्षण देऊन पश्चिम बंगालला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींंनी बलात्कारी राज्य केले आहे. वर्षोनवर्षे अशा बलात्काराच्या निंदनीय घटना पश्चिम बंगालमध्ये होत आहेत. मात्र या प्रकरणांत बलात्कारी

गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासंदर्भात इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांचे मौन बरेच काही सांगते. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात आवाज उठविणाऱ्या सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोपही शुक्ला यांनी केला.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राक्षसी बलात्कार केलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे वक्तव्य करतात, तर दुसरीकडे इंडी आघाडीला पीडित महिलेबाबत जरासुद्धा कणव नाही. विशिष्ट धर्माचे लोक अपराधी असल्यानंतर पीडितांना न्याय देण्याऐवजी ही मंडळी बलात्कारी, गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. इंडी आघाडी ही बलात्कारी बचाव आघाडी असून त्यांच्या मुस्लीम अपराध्यांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये रोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मविआ म्हणजे मजहबी, व्यभिचारी आणि अपराधी आघाडी असून या आघाडीचे उद्धव ठाकरे व अन्य नेते लव जिहाद करणाऱ्यांचे संरक्षक आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे दोघेही पीडित महिलांच्या बाजूने उभे न राहता मुस्लीम अपराधींना वाचवण्याचा हीन प्रयत्न करत आहेत, असेही शुक्ला म्हणाले.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content