Homeमुंबई स्पेशलकोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी...

कोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी आघाडीचे मौन

कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही इंडी आघाडीची मंडळी एक शब्दही काढत नाहीत. अशा बलात्काऱ्यांच्या, लव्ह जिहाद्यांच्या विरोधात लढण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्धार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले.

विशिष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित, विशिष्ट धर्माशी संबंधित बलात्कारींना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुलेआम पाठीशी घालत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन देण्याबाबत इंडी आघाडीने मौन बाळगले आहे, असे ते म्हणाले.

बलात्काऱ्यांना संरक्षण देऊन पश्चिम बंगालला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींंनी बलात्कारी राज्य केले आहे. वर्षोनवर्षे अशा बलात्काराच्या निंदनीय घटना पश्चिम बंगालमध्ये होत आहेत. मात्र या प्रकरणांत बलात्कारी

गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासंदर्भात इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांचे मौन बरेच काही सांगते. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात आवाज उठविणाऱ्या सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोपही शुक्ला यांनी केला.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राक्षसी बलात्कार केलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे वक्तव्य करतात, तर दुसरीकडे इंडी आघाडीला पीडित महिलेबाबत जरासुद्धा कणव नाही. विशिष्ट धर्माचे लोक अपराधी असल्यानंतर पीडितांना न्याय देण्याऐवजी ही मंडळी बलात्कारी, गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. इंडी आघाडी ही बलात्कारी बचाव आघाडी असून त्यांच्या मुस्लीम अपराध्यांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये रोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मविआ म्हणजे मजहबी, व्यभिचारी आणि अपराधी आघाडी असून या आघाडीचे उद्धव ठाकरे व अन्य नेते लव जिहाद करणाऱ्यांचे संरक्षक आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे दोघेही पीडित महिलांच्या बाजूने उभे न राहता मुस्लीम अपराधींना वाचवण्याचा हीन प्रयत्न करत आहेत, असेही शुक्ला म्हणाले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content