Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना बुद्धिबळः...

चेंबूर जिमखाना बुद्धिबळः अनिरुद्ध पोटावाड यंदाही विजेता

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याने क्रिस्टल कम्युनिटी हॉल, जेड १ आणि जेड २ हॉलमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत यंदादेखील गतविजेत्या अनिरुद्ध पोटावाडने चमकदार कामगिरी करताना विजेतेपद कायम राखले.

अनिरुद्धने या स्पर्धेत ९ पैकी ८.५ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पारस भोईर आणि अर्णव कोळी यांचा अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक लागला. आयएम समीर खाटमाळे यांनी ९ पैकी ८ गुणांची कमाई केली. आयएम सौम्या स्वामीनाथनने या स्पर्धेत ९ पैकी ७ गुणांची कमाई केली.

स्पर्धेचे संयोजक आणि सीजी बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी खेळाडूंचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चेंबूर जिमखान्याला स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संबंधित बुद्धिबळ संघटनांचे आभार मानले. मध्य उपनगरातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ६०९ खेळाडूंचा सहभाग लाभला होता. या स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके होती. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content