Homeपब्लिक फिगरमी मंत्रालयात येणार...

मी मंत्रालयात येणार नाही.. आणि अधिवेशनही घेणार नाही!

मी मंत्रालयात येणार नाही. मी अधिवेशन घेणार नाही. माझ्या पक्षाविषयी बोललात तर मुंडण करू. केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करणार, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले हे ठाकरे सरकार आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी राज्यातल्या आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीबद्दल केली.

असंवेदनशील सरकार

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 50 हजार देऊ म्हणणाऱ्या सरकारने 10 हजारांची घोषणा केली. तेही देऊ शकले नाहीत. एफआरपीसाठी आंदोलने झाली. पण हे सरकार तीन टप्प्यात एफआरपी नको म्हणते. कोरोना काळात देशाचे अर्थचक्र ज्या शेतकऱ्यांनी चालवले त्या शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडली जात आहे. महिला अत्याचाराच्याबाबतीत तर अत्यंत असंवेदनशीलपणा दिसतो. गेल्या सात महिन्यात मुंबईत 550 बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले. बाकी पक्षाचे मंत्री, युवा संघटनेचे पदाधिकारी, मंत्री राजीनामा हे विषय सगळ्यांना माहित आहेच.. शक्ती कायदा कुठे आहे? 11वीचे प्रवेश कधी संपणार? मराठा समाजाचे आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. भूमिका काय? ओबीसी राजकीय आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. सरकार काय करणार?, अशा प्रश्नांचा भडिमारही त्यांनी केला.

अधिवेशन

फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्याभोवतीच फिरणारे सरकार

आघाडी सरकार फक्त “पुत्र, पुत्री आणि पुतण्या” याभोवतीच फिरणारे आहे. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा, या नाटकाप्रमाणे तीन पक्षांचा तमाशा आहे. सत्ता, संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनताकेंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या, याभोवती केंद्रित झालेले आहे.

अडचण काहीच नाही. एखाद्याला आपला पुत्र चांगले काम करावा, मोठा व्हावा असे वाटते. त्याच्या नेतृत्त्वामध्ये पुढचे यश मिळाले पाहिजे. ही पायाभरणी करायला एखाद्याला वाटले तर त्यात चूक असू शकत नाही. आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे यात चूक नाही, पण राज्यात निर्णय काय घेतले हे पाहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचे दिसते. राज्याची जगासमोर जी प्रतिमा गेली ती पब, पेग, पार्टी आणि पेग्विन अशीच दुर्दैवी गेली. मग जेव्हा मुंबईकर लोकल ट्रेन सुरू करा, असे म्हणत होते तेव्हा पब आणि बार सुरू केले गेले. जेव्हा मंदिर उघडा अशी मागणी झाली तेव्हा मदिरालाय उघडी केली, असे निर्णय पुत्रप्रेमाने झाले, असे ते म्हणाले.

सुपुत्रीच्या प्रेमापोटी गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांना बसव., त्यानंतर महाराष्ट्राची बदनामी करणारे वसुली, मटका किंग, बुकी यांच्यासोबत व्यवहार, पोलीस दलात गटबाजी, बदल्यांमधील भ्रष्टाचार असे चित्र समोर आले. पुतण्या प्रेमाने त्यांना पुतण्याला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान द्यावे लागले. पुतण्याचे काय उद्योग सांगावे? 1 हजार कोटींची बेनामी संपत्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी उघड केली. कुठून आली संपत्ती? सहकारी कारखाना उघडायचा, सरकारकडून जमीन, वीज सगळे सवलतीत मिळवायचे, शेतकऱ्यांकडून पैसा घ्यायचा, पण कारखाना तोट्यात दाखवायचा, बँकेने मग लिलाव करायचा, मग तोच कारखाना पुतण्याने विकत घ्यायचा.. असे पुतण्याचे नवीन उद्योग समोर आले, असेही शेलार म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content