Homeपब्लिक फिगरगद्दारांसमोर अविश्वासाच्या ठरावाला...

गद्दारांसमोर अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जायचे नव्हते!

ज्या पक्षाने सर्व काही दिलं त्या पक्षाशी गद्दारी करून माझ्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणणाऱ्या गद्दारांसमोर मला जायचे नव्हते म्हणून नेतिकतेच्या कारणावरून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे समाधान झाले. देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, असा प्रश्न होता. सत्तेसाठी हपापलेले लोक जे उघडेनागडे राजकारण करत होती त्याची चिरफाड सर्वोच्च न्यायालयाने केली. राज्यपालांची भूमिकाही अयोग्य होती. त्याचे वस्त्रहरण या निकालात करण्यात आले. राज्यपाल नावाची जी यंत्रणा आहे ती आतापर्यंत एक आदरयुक्त यंत्रणा होती. मात्र शासनकर्ते या यंत्रणेचे जे धिंदवडे काढतात ते लक्षात घेता ही यंत्रणा यापुढे अस्तित्त्वात ठेवावी की नाही हा विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे न्यायालयाने सोपवला आहे. मात्र त्यावेळचा पक्ष म्हणजे माझी शिवसेना यांच्या पक्षादेशाचा विचार त्यांना करावाच लागेल. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा आमचा आग्रह राहील. आता लढायला सुरुवात झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यासाठी इथे आले आहेत. आम्हाला देशाला वाचवायचे आहे. संविधानाला वाचवायचे आहे. देशाला पुन्हा गुलाम बनवणाऱ्या प्रवृत्तींना घरी पाठवायचे आहे. याकरीता सर्व पक्ष, सर्व लोकांना एकत्र करण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

नितीश कुमार यांनी याला दुजोरा देताना जास्तीतजास्त राजकीय पक्षांनी एकत्र यावे आणि त्यांची एकजूट कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे एक पाऊल म्हणूनच आम्ही येथे आलो आहोत, असे यावेळी सांगितले.

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content