Tuesday, February 4, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजउन्हातान्हात आणखी तापणार...

उन्हातान्हात आणखी तापणार तरी किती?

गेले दोन महिने मी उन्हातान्हात तापतोय आणि मी तुम्हाला विचारतोय की, देशात उष्णतेची कमतरता आहे का? खरे तर हा प्रश्नच चुकीचा आहे असे तुम्हाला वाटू शकेल. पण आपल्याबद्दल बाहेर काय बोलले जाते आणि ते किती खरे आहे हेदेखील बघायला हवे.

पॅरिसमध्ये जागतिक पातळीवरच्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. तेथेही उन्हाळा तापतो आहे. पण तेथे त्यांनी वातानुकूलन बंदच केले अशी बातमी आहे. अशावेळी कसे राहणार खेळाडू एअर कंडिशनरशिवाय म्हणजेच एसीशिवाय? हा प्रश्न तर येणारच. हाच धागा पकडून थोडे पुढे जाऊ या.

आपल्या देशात उन्हाळा अधिक तापणार आहे अशा बातम्या आल्याबरोबर सर्वात आधी काही होत असेल तर या वर्षी एसी घ्यावाच लागणार अशी मानसिकता तयार होते. त्यासाठी घरातील सर्वांचा होकार

असतोच, नव्हे तो आग्रह असतो. याच्या अगोदर हिवाळ्यामध्ये एसी कंपन्या जाहिराती लावून लावून थकलेल्या असतात आणि थोडीफार सवलतही देतात. पण यावेळी आपल्याला ते जमणार नसते. का म्हणून विचारू नका. हेच महिने आयकराची रक्कम भरण्याचे असतात.

उन्हाळा सुरु होतो. काही दिवस मुलांची उन्हाळ्याच्या सुट्टीची हौस पुरवायचे असतात. ते काम झाले की पुन्हा आपण घरी येतो आणि पंख्याची गरम हवा आता बोचरी होऊ लागते. हिशेब पाहिले जातात आणि एसीसाठी लागणारे कर्ज घेण्याची तयारी सुरु होते. कर्ज मिळते.. रक्कम फार मोठी नसली तरी अडचण होऊ शकेल अशी असते. कर्जाचे हप्ते एकतर सरळ पगारातून वजा होतात, नाहीतर दर महिन्याचे धनादेश दिलेले असतातच.

एसीला वीजबीलसुद्धा बरेच येते. त्यामुळे वेळेचे रेशनिंग केले जाते. अर्थात घरातील एकाच खोलीत एसी बसविण्याची जेमतेम आर्थिक पात्रता असते. बाकी सर्व कर्ज काढूनच.. एका अंदाजानुसार २०२८पर्यंत एसी विक्री अंदाजे ३५० कोटी रुपयांपर्यंत गेली असेल असे मानले जाते. भारत हा माझा देश आहे आणि जोपर्यंत उन्हाळ्यातील तापमान सामान्य होत नाही तोपर्यंत जमेल त्या मार्गाने एसी खरेदी करून उन्हाळ्यावर मात करणे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटणारच. नाही का?  

Continue reading

सावधान! स्मृतिभ्रंश होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय!!

केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक संपन्न देशांमध्ये स्मृतिभ्रंश होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यातच या रोगाविषयी तज्ज्ञांचे मत असे आहे की, अशा लोकांची संख्या आता वाढतच जाणार आहे. अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या एका देशात या रोगाने ग्रस्त लोकांची...

कृत्रिम बुद्धिमत्ता नाही तर माणूसच पळवणार आपल्या नोकऱ्या..

नवीन वर्षात आणि त्यानंतर होणार असलेल्या बदलांबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याच वर्षीच्या सुरुवातीला अनेक विज्ञान नियतकालिकांनी २०२५मध्ये काय-काय होऊ शकते याचे भविष्य मांडले. त्यातली सर्वात महत्त्वाची आणि माणसाच्या जीवनाशी निगडित असलेली एक चर्चा आहे ती अशी की...

काय करू शकते एक ग्रॅम मीठ?

तू मला मिठासारखी आवडते असे सांगून मिठाची महानता जगाला पटवून देणारी पुराणातली कथा सोडून दिली तरी आजही एखाद्या पदार्थात मीठच नसेल तर तो पदार्थ कितीही श्रम करून बनवला गेला असला तरी त्याला चविष्ट म्हणता येत नाही. आहारातील मीठ तर...
Skip to content