Homeचिट चॅटवस्ताद वसंतराव पाटील...

वस्ताद वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरु पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे सर्वेसर्वा वसंतराव य. पाटील यांना यंदाचा गुरुवर्य मल्लगुरू पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी शिक्षणरत्न पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. आर. एस. साळुंखे, उद्योगरत्न पुरस्कारप्राप्त प्रशांत आनंदराव पाटील, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त प्रतापराव शिवाजीराव मोहिते-पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पैलवान नजरुद्दीन नायकवडी व प्रतिष्ठा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तानाजी राजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियांका भगत, नीता मोरे, नलिनी पाटील यांनादेखील क्रीडारत्न पुरस्कार देण्यात आला. वसंतराव पाटील गेली चार दशके कुस्ती खेळात कार्यरत असून अनेक युवा मल्ल घडवण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content