Homeचिट चॅटवस्ताद वसंतराव पाटील...

वस्ताद वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरु पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे सर्वेसर्वा वसंतराव य. पाटील यांना यंदाचा गुरुवर्य मल्लगुरू पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी शिक्षणरत्न पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. आर. एस. साळुंखे, उद्योगरत्न पुरस्कारप्राप्त प्रशांत आनंदराव पाटील, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त प्रतापराव शिवाजीराव मोहिते-पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पैलवान नजरुद्दीन नायकवडी व प्रतिष्ठा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तानाजी राजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियांका भगत, नीता मोरे, नलिनी पाटील यांनादेखील क्रीडारत्न पुरस्कार देण्यात आला. वसंतराव पाटील गेली चार दशके कुस्ती खेळात कार्यरत असून अनेक युवा मल्ल घडवण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content