Homeमुंबई स्पेशलपार्ले महोत्सवाचे मुंबईत...

पार्ले महोत्सवाचे मुंबईत शानदार उद्घाटन!

पार्ले महोत्सवाने अनेकांना व्यासपीठ दिले. त्यातून उत्तम संघटक आणि नेतृत्त्व करणाऱ्यांबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि कलाकार निर्माण केले. त्यांनी राज्याचे आणि देशाचे नाव मोठे केले. त्यामुळेच या महोत्सवात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले महोत्सव २०२३च्या उद्घाटनप्रसंगी केले.

पार्ले

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात आहे. मुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती (Culture), खाद्यसंस्कृती (Cuisine) आणि कलाकार (Celebrity) यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला. पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो. येणाऱ्या काळात येथील फॅनेल झोन आणि विमानतळाजवळील झोपडपट्टी पुनवर्सन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यंदा पार्ले महोत्सवाचे २३वे वर्ष असून विविध ३२ स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी होत आहेत. या महोत्सवाचे वामन मंगेश दुभाषी मैदानावरील शानदार सोहळ्यात मशाल प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजन, महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि आमदार पराग अळवणी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, अभिनेते शैलेंद्र दातार, अभिनेत्री सुधा चंद्रन, नगरसेविका ज्योती अळवणी, अनिल गानू, माधव राजवाडे, डॉ. अलका मांडके आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पार्ले महोत्सवाचे आयोजक पराग अळवणी यांनी या महोत्सवातून नेतृत्त्व करणारी मंडळी घडवली. त्यामुळेच त्यांना सुपर लीडर म्हणता येईल, तसेच पार्लेकर हा महोत्सव घरचे कार्य समजून येतात, हे विशेष. यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षित असलेली खेलो इंडियाची चळवळ पुढे जात असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले.

या महोत्सवाच्या शानदार गीताचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मयूरेश माडगांवकर आणि कलाकारांनी त्याची निर्मिती केली आहे. यावेळी जान्हवी जाधव, अक्षय तरळ या महोत्सवातून पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा आणि सारेगम स्पर्धेची उपविजेती पार्लेकर श्रावणी वागळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्रावणी वागळे हिच्या गाण्याने तसेच हास्यकलाकार समीर चौगुले आणि चेतना भट यांच्या प्रहसनाने कार्यक्रमात रंगत आणली.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content