Homeब्लॅक अँड व्हाईट6 आफ्रिकी देशांतील...

6 आफ्रिकी देशांतील सरकारी अधिकारी घेताहेत भारतात प्रशिक्षण!

भारत सरकारची सर्वोच्च-स्तरीय स्वायत्त संस्था असलेल्या राष्ट्रीय सुशासन केंद्राच्या (एनसीजीजी) वतीने, आफ्रिकी देशांतील सरकारी अधिकाऱ्यांसाठी सार्वजनिक धोरण आणि प्रशासन या विषयावरील दोन आठवड्यांचा अत्याधुनिक नेतृत्त्व विकास कार्यक्रम नुकताच सुरू करण्यात आला. इरिट्रिया, केनिया, इथिओपिया, टांझानिया, गांबिया आणि इस्वाटिनी या सहा देशांतील 36 वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

आफ्रिकी

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव आणि एनसीजीजीचे महासंचालक व्ही. श्रीनिवास यांनी उदघाटन सत्राला संबोधित केले. आपल्या भाषणात, श्रीनिवास यांनी सहभागी देशांच्या मंत्रालयांच्या शिफारशींवर आधारित कार्यक्रमाच्या सारासार कार्यपद्धतीवर  प्रकाश टाकला. भूमी व्यवस्थापन, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन, शहरी जमीन व्यवस्थापन या विषयांवरील क्षमता बांधणी कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासह स्वामित्व योजना, ग्रामीण मालमत्ता सर्वेक्षण कार्यक्रम आणि भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, बांधकाम क्षेत्र नियामक प्राधिकरण, पीएम गति शक्ती इत्यादी विषयांचा समावेश असलेली व्याख्याने या कार्यक्रमाचा भाग आहेत.

डिजिटल परिवर्तनासाठी भारताच्या वचनबद्धतेवर भर देत, नागरिकांना सरकारच्या जवळ आणण्यात तंत्रज्ञानाचे योगदान व्ही. श्रीनिवास यांनी अधोरेखित केले. भारताच्या किमान शासन, कमाल प्रशासन या धोरणात नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, नागरिक आणि सरकार यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी संस्थांचे डिजिटल परिवर्तन यावर लक्ष केंद्रित केले आहे, हे श्रीनिवास यांनी अधोरेखित केले. केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीचा  वापरून प्रभावी तक्रार निवारण, ई-सेवांवर केंद्रित सचिवालय सुधारणा आणि एकात्मिक सेवा पोर्टलद्वारे सेवा वितरण सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारत लाखो नागरिकांना ई-सेवा म्हणून 16000 हून अधिक सेवांचा लाभ देत आहे. क्षमता बांधणी कार्यक्रम भूमी सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच तंत्रज्ञानातील भारताची प्रगती, भ्रष्टाचार धोरण खपवून न घेण्याचे आणि प्रशासनातील नितीमूल्ये सादर करण्याचा प्रयत्न करतो.

क्षमता-बांधणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण हे अभ्यासक्रम समन्वयक डॉ. ए.पी. सिंह, सहयोगी अभ्यासक्रम समन्वयक डॉ. मुकेश भंडारी, कार्यक्रम सहाय्यक संजय दत्त पंत, आणि एनसीजीजीची समर्पित क्षमता-बांधणी चमू करणार आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content