Tuesday, February 4, 2025
Homeचिट चॅट‘गोवा काजू फेणी’ला...

‘गोवा काजू फेणी’ला आले ‘अच्छे दिन’!

दारूचा आनंद लुटणाऱ्या मद्यपींना गोवा काजू फेणीची लज्जत काय असते हे नव्याने सांगायला नको. त्यामुळेच गोव्यातून महाराष्ट्रात येणारे कित्येक जण गोवा काजू फेणीची तस्करी करतात. दारूच्या थेंबालाही न शिवणारेही असंख्य लोक यात कळतनकळत सहभागी होतात.

गोव्याच्या याच काजू फेणीला सध्या जरा जास्त महत्त्व आले आहे. कालच गोवा टपाल विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 दरम्यान गोवापेक्स 2021 या जिल्हास्तरीय आभासी फिलाटेली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनातील पहिल्या टप्प्यात काल गोवा काजू फेणीवर विशेष कव्हर आणि कॅन्सलेशनचे प्रकाशन झाले. पोस्ट मास्तर जनरल कर्नल एस एफ एच रिझवी यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. पणजी मुख्यालयात हे कव्हर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

अमृत महोत्सव आणि गोवा मुक्ती हीरक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने आगामी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात फिलाटेलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि गोव्यातील वारसास्थळे आणि संस्कृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

फेणी तयार करण्याच्या प्रक्रियेवर हे कव्हर आधारीत आहे. या विशेष कॅन्सलेशन प्रकाशनाप्रसंगी वरिष्ट टपाल अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे, गोवा फिलाटेली आणि न्यूमीस्मॅटीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार यांची उपस्थिती होती.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content