Tuesday, February 4, 2025
Homeपब्लिक फिगरअंधेरी ते दहिसर...

अंधेरी ते दहिसर मेट्रोला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या – वायकर

मुंबईचे जनजीवन तसेच प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी मुंबईत उभारण्यात येणार्‍या मेट्रोच्या जाळ्यापैकी एक, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाईन क्रमांक ७ला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो लाईन क्रमांक ७’ असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. सर्वच स्तरातील जनसामान्यांची त्यांच्याप्रती आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कुंचल्यातून समाजातील विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसूड ओढले. मार्मिकसारख्या व्यंगचित्र मासिकामधून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिवंत ठेवण्याचे महानकार्य शिवसेनाप्रमुखांचे होते.

१९ जून १९६६ रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना होऊन या पदाच्या प्रमुखपदावर अर्थात शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांचे नेतृत्त्व संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानने अत्यंत स्वाभिमानाने स्वीकारले. कुठल्याही राज्यातील दळणवळणाची साधने अधिक सक्षम केल्यास त्या राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास जास्त वेळ लागत नाही. ही त्यांची दूरदृष्टी १९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आल्यानंतर जनतेला पाहायला मिळाली, ती मुंबईत उभारण्यात आलेल्या ५५ उड्डाणपूल व मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या रुपाने. उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे या महाविभूतीचे, व्यंगचित्रकाराचे, मराठी मनाच्या अस्मितेचे, हिंदुत्वरक्षकाचे नाव ‘हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो क्रमांक ७’ देऊन त्यांच्या या कार्याचा यथेच्छ सन्मान करावा, असा प्रस्ताव आमदार वायकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

या प्रश्‍नी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील हा प्रस्ताव देण्यात आला असून चर्चाही करण्यात आली आहे. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव तसेच एमएमआरडीएचे आतिरिक्त आयुक्त डॉ. सोनिया शेठ यांनादेखील हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content