Wednesday, February 5, 2025
Homeबॅक पेजडॅशिंग स्पोर्ट्स क्लबने...

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने पटकावली घोष ट्रॉफी!

खुशी निजाई (नाबाद ६०) आणि लेग स्पिनर श्रेया सुरेश (१८ धावात ४ बळी) या दोघींच्या शानदार प्रदर्शनामुळे डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा ४८ धावांनी सहज पराभव करून चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या अधिकृत स्पर्धेमध्ये आठ संघांचा सहभाग होता. स्पोर्टिंग युनियन, कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

डॅशिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करली. पण काही वेळातच उण्यापुऱ्या २० धावांवर त्यांनी तीन विकेट गमावल्या. त्यानंतर खुशीच्या खेळीमुळे त्यांना ५ बाद १३६ धावांचा पल्ला गाठता आला. खुशीने बचाव आणि आक्रमण यांचा मिलाफ साधत ४५ चेंडूत ६० धावा काढल्या. त्यात तिने ८ चौकार मारले. तिने ईशिका जगताप (२२) हिच्यासह चौथ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८० धावांची भागीदारी केली.

प्रथम दर्शनी काहीशी कमी वाटणारी डॅशिंगची धावसंख्या मग फारच मोठी भासू लागली. कारण एमआयजीचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे धावगतीपण मंदावली. डॅशिंगच्या श्रेया सुरेशने १३व्या षटकात एकही धाव न देता ३ विकेट्स घेत एमआयजीची ७ बाद ६१ अशी अवस्था करताच विजेतेपदाचा निकाल लागून गेला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू पूनम राऊत, युरोपेमचे कंट्रीहेड बी. सी. पटेल तसेच एमसीएचे अभय हडप यांच्या हस्ते संपन्न झाला.

संक्षिप्त धावफलक

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबः २० षटकांमध्ये ५ बाद १३६ (खुशी निजाई नाबाद ६०, ईशिका जगताप २२, हर्षी पुरस्नानी १७/३, ख्याती स्वेन २०/२)

विजयी विरुद्ध

एमआयजी क्रिकेट क्लबः १९.५ षटकात सर्वबाद ८८ (हिर कोठारी १९, श्रेया सुरेश १८/४)

सामन्यात सर्वोत्तमः श्रेया सुरेश

स्पर्धेत सर्वोत्तमः महेक मिस्त्री (एमआयजी)

सर्वोत्तम फलंदाजः रिया पवार (युरोपेम)

सर्वोत्तम गोलंदाजः त्रिशा नायर (डॅशिंग)

स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूः किंजल कुमारी (साईनाथ)

Continue reading

गडचिरोली मलेरियामुक्तीसाठी 1 एप्रिलपासून होणार खास प्रयत्न

महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे....

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...
Skip to content