Homeबॅक पेजडॅशिंग स्पोर्ट्स क्लबने...

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने पटकावली घोष ट्रॉफी!

खुशी निजाई (नाबाद ६०) आणि लेग स्पिनर श्रेया सुरेश (१८ धावात ४ बळी) या दोघींच्या शानदार प्रदर्शनामुळे डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा ४८ धावांनी सहज पराभव करून चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या अधिकृत स्पर्धेमध्ये आठ संघांचा सहभाग होता. स्पोर्टिंग युनियन, कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

डॅशिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करली. पण काही वेळातच उण्यापुऱ्या २० धावांवर त्यांनी तीन विकेट गमावल्या. त्यानंतर खुशीच्या खेळीमुळे त्यांना ५ बाद १३६ धावांचा पल्ला गाठता आला. खुशीने बचाव आणि आक्रमण यांचा मिलाफ साधत ४५ चेंडूत ६० धावा काढल्या. त्यात तिने ८ चौकार मारले. तिने ईशिका जगताप (२२) हिच्यासह चौथ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८० धावांची भागीदारी केली.

प्रथम दर्शनी काहीशी कमी वाटणारी डॅशिंगची धावसंख्या मग फारच मोठी भासू लागली. कारण एमआयजीचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे धावगतीपण मंदावली. डॅशिंगच्या श्रेया सुरेशने १३व्या षटकात एकही धाव न देता ३ विकेट्स घेत एमआयजीची ७ बाद ६१ अशी अवस्था करताच विजेतेपदाचा निकाल लागून गेला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू पूनम राऊत, युरोपेमचे कंट्रीहेड बी. सी. पटेल तसेच एमसीएचे अभय हडप यांच्या हस्ते संपन्न झाला.

संक्षिप्त धावफलक

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबः २० षटकांमध्ये ५ बाद १३६ (खुशी निजाई नाबाद ६०, ईशिका जगताप २२, हर्षी पुरस्नानी १७/३, ख्याती स्वेन २०/२)

विजयी विरुद्ध

एमआयजी क्रिकेट क्लबः १९.५ षटकात सर्वबाद ८८ (हिर कोठारी १९, श्रेया सुरेश १८/४)

सामन्यात सर्वोत्तमः श्रेया सुरेश

स्पर्धेत सर्वोत्तमः महेक मिस्त्री (एमआयजी)

सर्वोत्तम फलंदाजः रिया पवार (युरोपेम)

सर्वोत्तम गोलंदाजः त्रिशा नायर (डॅशिंग)

स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूः किंजल कुमारी (साईनाथ)

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content