Homeटॉप स्टोरी१ मेपासून शैक्षणिक...

१ मेपासून शैक्षणिक साहित्य मिळवा नाममात्र दरात!

भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीच्या ज्ञानसंवर्धनासाठी लागणारी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक स्वस्तात उपलब्ध होण्याकरीता येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून (येत्या गुरूवारपासून) टपाल खात्यातर्फे ‘ज्ञान पोस्ट’ नावाची सेवा सुरू करण्यात येत आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सेवेसाठी राजपत्र अधिसूचनेच्या प्रकाशनाची काल घोषणा केली.

शैक्षणिक

भारतीय टपाल कार्यालयांद्वारे पुस्तके व अध्ययन साहित्य परवडणाऱ्या दरात पोहोचवण्यासाठी ही नवी सेवा आहे. ज्ञान पोस्ट, ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वितरण यंत्रणा राहणार आहे. या सेवेचा उद्देश संपूर्ण भारतात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक परवडणाऱ्या दरात वितरित करणे हा आहे. ही सेवा शिक्षणाला पाठिंबा देण्याबाबतच्या भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.

शिक्षण ही मजबूत भविष्यासाठीची पायाभूत गोष्ट आहे. मात्र शिकण्याच्या साधनांपर्यंतची पोहोच भौगोलिक स्थान किंवा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असू नये, यादृष्टीने ‘ज्ञान पोस्ट’ ही सेवा तयार करण्यात आली आहे, जेणेकरून कोणतेही पाठ्यपुस्तक, तयारी मार्गदर्शक किंवा सांस्कृतिक पुस्तक शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे अगदी दुर्गम खेड्यांपर्यंतही पोहोचू शकेल, असा विश्वास सिंधिया यांनी यावेळी व्यक्त केला. अभ्यास आणि ज्ञानवाटपाला मदत करण्यासाठी ‘ज्ञान पोस्ट’ सेवा परवडणाऱ्या दरात पुस्तके आणि मुद्रित शैक्षणिक साहित्य भारतातील विस्तृत टपाल जाळ्यातून पाठविण्याचा पर्याय देते. ही सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीकोनातून याचे दर आकारण्यात येणार आहेत. ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवली जाणारी पुस्तके व मुद्रित शैक्षणिक साहित्य पाठपुरावा करण्यायोग्य असेल आणि ते भूमार्गाने पाठवले जाईल, ज्यामुळे खर्च कमी होईल. ही पार्सल सेवा अतिशय परवडणाऱ्या दरात पाठवता येईल. ३०० ग्रॅम वजनाच्या पॅकेटसाठी फक्त २०  रुपयांपासून पाच किलोग्रॅमपर्यंतच्या पाकिटासाठी जास्तीतजास्त १०० रुपयांपर्यंत (कर वगळता) याचा दर असेल. फक्त व्यावसायिक नसलेले शैक्षणिक साहित्यच ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवण्यासाठी पात्र असेल. ‘ज्ञान पोस्ट’ सेवा भारतातल्या सर्व विभागीय टपाल कार्यालयांमध्ये १ मे २०२५पासून कार्यान्वित होईल. अधिक माहितीसाठी जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content