Homeबॅक पेजभू-अभिलेखासाठी उपयुक्त जिओपोर्टलचे...

भू-अभिलेखासाठी उपयुक्त जिओपोर्टलचे अनावरण

संपूर्ण देशभरातील विविध स्थानांसाठी 1:10K स्केलची उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा प्रदान करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि नियोजनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ग्रामीण भू-अभिलेखासाठी ‘भुवन पंचायत (आवृत्ती. 4.0)’ पोर्टल आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) विकसित केलेल्या “आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेटाबेस (एनडीइएम आवृत्ती. 5.0)” या दोन जिओपोर्टलचे अनावरण केंद्रीय भू विज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पृथ्वी भवन येथे केले.

आम्ही केवळ रॉकेट प्रक्षेपित करून अंतराळात पोहोचलो नाही तर आम्ही आकाशातून पृथ्वीचे मॅपिंगदेखील करत आहोत. अंतराळ-तंत्रज्ञानाने अक्षरशः प्रत्येक घरात प्रवेश केला आहे. अंतराळातील विकासाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर बहुआयामी प्रभाव पडेल मग ते टेलिमेडिसिन

असो, डिजिटल इंडिया असो. मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ओळखणे असो असा विश्वास असणाऱ्या अंतराळ तंत्रज्ञानाचे जनक विक्रम साराभाई यांचा दृष्टिकोन आपण योग्यरीत्या पुढे नेत आहोत असे, डॉ. सिंह यावेळी म्हणाले.

पंचायतींमधील तळागाळातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी ‘भुवन पंचायत पोर्टल’चे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, जमिनीच्या नोंदींसाठी स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहण्याची गरज कमी करून आणि डिजिटलायझेशन आणि जमीन महसूल व्यवस्थापनाद्वारे भूमी अभिलेख व्यवस्थापनात क्रांती घडवून आणून त्यांना या सेवांचा लाभ घेण्याची परवानगी देण्यासाठी तळागाळातील नागरिकांना सक्षम करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही साधने नागरिकांकडून प्राप्त माहितीनुसार अद्ययावत डेटा प्रदान करतील आणि तळागाळातील भ्रष्टाचार कमी करतील.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content