सहा बंदरसमुहांपैकी चार बंदरसमुह म्हणजे कोचीन – विझिंजम बंदरसमुह, गॅलेथिया साउथ बे बंदर, चेन्नई – कामराजर – कुड्डालोर बंदरसमुह, पारादीप तसेच वार्षिक 300 दशलक्ष टनांपेक्षा (एमटीपीए) जास्त क्षमता असलेले इतर कमी महत्त्वाचे बंदरसमुह तसेच 500 एमटीपीएपेक्षा जास्त क्षमतेचे इतर दोन बंदरसमुह म्हणजे दीनदयाल आणि टुना टेकरा बंदरसमुह, तसेच जवाहरलाल नेहरू – वाढवण बंदरसमुह, 2047पर्यंत भव्य बंदर म्हणून विकसित केले जाणार आहेत.

क्षमता वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रमुख बंदरांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचा सागरी अमृतकाळ व्हिजन, 2047 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने आणि अंतर्गत संसाधनांद्वारे मुख्य बंदरांमधील पायाभूत सुविधा वाढवणे आणि क्षमता वाढवणे ही कामे आधीच प्रगतीपथावर आहेत.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
