Homeपब्लिक फिगरराजनाथ सिंह यांच्या...

राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पहिली नौदल कमांडर परिषद सुरू

नौदल कमांडरांच्या पहिल्या परिषदेला काल नवी दिल्लीत सुरूवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उद्घाटनपर सत्रात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्रात उतरुन भारतीय नौदलाच्या दोन विमानवाहू युद्धनौकांच्या परिचालनाच्या क्षमतेचा अनुभव घेतला. दोन्ही विमानवाहू युद्धनौकांनी भारताच्या सागरी हिताचे संरक्षण करण्याच्या बाबतीत नौदलाच्या वाढत्या क्षमतांचे दर्शन घडवले.

या सत्रादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल कमांडरांनादेखील संबोधित केले. भारतीय नौदलाच्या वाढत्या बहुआयामी क्षमतांबद्दल तसेच सातत्याने नेतृत्त्वाच्या भूमिकेत उदयाला येत असल्याबद्दल त्यांनी नौदलाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सागर (एसएजीएआर) अर्थात प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि विकास या संकल्पनेला अनुसरून हिंद-प्रशांत प्रदेशात शांतता आणि समृद्धी निर्माण करण्याच्या दिशेने नौदल करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. हिंद-प्रशांत प्रदेशात भारतीय नौदलाने राबवलेल्या सागरी चाचेगिरीविरोधी कारवायांची प्रशंसा करून संरक्षणमंत्री म्हणाले की यासाठी देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतीय नौदलाचे कौतुक होत आहे.

जागतिक वचनबद्धतांची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासोबतच सागरी सुरक्षा तसेच भारताचे सार्वभौमत्व कायम राखण्यात नौदलाच्या महत्त्वपूर्ण योगदानावर राजनाथ सिंह यांनी अधिक भर दिला. हिंद महासागर क्षेत्रात तसेच आणखी विस्तृत अशा हिंद-प्रशांत परिसरात जर भारताचा नावलौकिक वाढला असेल तर हे आपल्या नौदलाच्या शौर्यामुळे तसेच तत्परतेमुळे घडले आहे. हिंद प्रशांत परिसरात भारतीय नौदलाने विश्वासार्हता मिळवली आहे. आपले नौदल म्हणजे जागतिक प्रतलावर भारताच्या वाढत्या पातळीचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले.

या परिषदेमध्ये संरक्षण दल प्रमुखांसह भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचे प्रमुखदेखील नौदल कमांडरांसह या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सामायिक राष्ट्रीय संरक्षण पर्यावरणाच्या कल्पनेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सेनादलांच्या एककेंद्रीकरणाबाबत चर्चा करतील. तिन्ही सेनादलांच्या दरम्यानचा समन्वय तसेच देशाच्या संरक्षणासाठीची सज्जता वाढवण्याच्या मार्गांचा शोध ते यावेळी घेतील.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content