Wednesday, February 5, 2025
Homeमुंबई स्पेशलरोहित पवार, राजेश...

रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावरही गुन्हे दाखल करा!

दगडफेक करुन हिंसा भडकवण्याचे षडयंत्र रचणारे, कारखान्यात याचे नियोजन करणारे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन, या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. यावेळी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा दरेकर यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणाच्या दौर्‍यावर असताना, अमृत महोत्सवी की रौप्य महोत्सवी वर्ष हे माहिती नसणार्‍याला कानाखाली मारली असती या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर, मविआ सरकारने राणेंवर गुन्हे  दाखल करुन, तुरुंगात टाकले होते. मग आता उपमुख्यमंत्र्यांबाबतीत जरांगे अश्लाघ्य वक्तव्य करत असतील तर, या राज्यात सर्वांसाठी कायदा सारखा असला पाहिजे. त्यामुळे जरांगेंवरदेखील गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आम्हीही सोबतच राहिलेलो आहोत. पण लोकं जमली म्हणून डोक्यात हवा जाऊन अहंकार आला. आणि याला बघून घेईन, त्याला बघून घेईन, बामणी कावासारखी भाषा यांच्या तोंडी आली. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही. याची चौकशी करुन, कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी केली.

जरांगेंनी सांगिलं होते की, मी समाजाकडून एक रुपया घेणार नाही. कुणी वर्गणी गोळा करायची नाही. मग मोठमोठे मोर्चे निघाले, जेसीबीने पुप्षवर्षा करण्यात आली. या सभांसाठी लाखो रुपये झालेला खर्च, ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ते आले कुठून? मराठा आंदोलक आणि जरांगे यांच्या सहकारी संगिता वानखेडे यांनी सांगितले की, या आंदोलनाचा संपूर्ण खर्च शरद पवार यांनी केला. त्यांचे बॅनर, पोस्टरचा खर्चसुध्दा पवारांचेच नेते करत होते. एवढेच नाही तर, जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. पण शरद पवारांचे जरांगेंना फोन येत होते आणि जरांगे पवारांचेच ऐकत होते, असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांचे फोन जरांगेंना येत होते का?, जरांगे शरद पवारांच्या सांगण्यानुसार वागत होते का? याची चौकशी झाली पाहिजे. आणि या आंदोलनासाठी झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशीदेखील ईडीमार्फत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content