Monday, October 28, 2024
Homeटॉप स्टोरीमोदी सरकारच्या काळात...

मोदी सरकारच्या काळात 12 हजार कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

अंमली पदार्थांना आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने काल तीन ध्वनी-चित्रफिती जारी केल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर याबाबत टिप्पण्यांची आणि ध्वनी-चित्रफितींची मालिका जारी केली आहे. मोदी सरकारच्या काळात अंमली पदार्थविरोधी यंत्रणांनी 12 हजार कोटी रुपयांचे 12 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट केले. 

अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत मोदी सरकारच्या कठोर धोरणाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. या संदर्भात अटक केलेल्यांच्या संख्येत आणि जप्तीच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ, ही या धोरणाची फलनिष्पत्ती आहे, असे शाह यांनी आपल्या एका टिप्पणीत म्हटले आहे.

अँमली

दुसऱ्या एका टिप्पणीत शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि गुन्हे प्रतिबंधक संस्था यांच्यातील समन्वय, सहकार्य आणि सहयोगाद्वारे, अंमली पदार्थविरोधी एक देशव्यापी अभेद्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. या रणनीतीमुळे अंमली पदार्थांची जप्ती आणि गुन्ह्यांची नोंद, यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शाह म्हणाले की, #DrugsfreeBharat (अंमली पदार्थमुक्त भारत) ही मोहीम, आपल्या भावी पिढीसाठी सर्वात मोठी भेट आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली, अंमली पदार्थांचा शोध घेणे, अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करत गुन्हेगारांना अटक करणे याद्वारे आपला देश लक्ष्य वेगाने साध्य करत आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांमुळे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण जवळपास 100%नी वाढले आहे आणि या प्रकरणांतील गुन्हेगारांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 152%नी वाढ झाली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2006 ते 2013 या कालावधीत 1257 गुन्ह्यांची नोंद झाली असून ही संख्या 2014-2023 या कालावधीत तिपटीने वाढून 3755 वर पोहोचली आहे.

अँमली

2006-13 या कालावधीमधील अटक झालेल्यांच्या 1363च्या तुलनेत, 2014-23 या कालावधीमध्ये अटकेच्या प्रमाणात चौपट वाढ होऊन ही संख्या 5745पर्यंत पोहोचली आहे. 2006-13 या कालावधीत जप्त केलेल्या 1.52 लाख किलो अंमली पदार्थांच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण दुपटीने वाढून 3.95 लाख किलो इतके झाले आहे. मोदी सरकारच्या काळात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 2006-13 या कालावधीतील 768 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 पटीने वाढून 22,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जून 2023पर्यंत, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-NCBने अशा 23 प्रकरणांमध्ये आर्थिक तपास करुन, 74,75,00,531 रुपये किंमतीची मालमत्ता गोठवली आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content