Homeटॉप स्टोरीमोदी सरकारच्या काळात...

मोदी सरकारच्या काळात 12 हजार कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

अंमली पदार्थांना आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने काल तीन ध्वनी-चित्रफिती जारी केल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर याबाबत टिप्पण्यांची आणि ध्वनी-चित्रफितींची मालिका जारी केली आहे. मोदी सरकारच्या काळात अंमली पदार्थविरोधी यंत्रणांनी 12 हजार कोटी रुपयांचे 12 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट केले. 

अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत मोदी सरकारच्या कठोर धोरणाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. या संदर्भात अटक केलेल्यांच्या संख्येत आणि जप्तीच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ, ही या धोरणाची फलनिष्पत्ती आहे, असे शाह यांनी आपल्या एका टिप्पणीत म्हटले आहे.

अँमली

दुसऱ्या एका टिप्पणीत शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि गुन्हे प्रतिबंधक संस्था यांच्यातील समन्वय, सहकार्य आणि सहयोगाद्वारे, अंमली पदार्थविरोधी एक देशव्यापी अभेद्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. या रणनीतीमुळे अंमली पदार्थांची जप्ती आणि गुन्ह्यांची नोंद, यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शाह म्हणाले की, #DrugsfreeBharat (अंमली पदार्थमुक्त भारत) ही मोहीम, आपल्या भावी पिढीसाठी सर्वात मोठी भेट आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली, अंमली पदार्थांचा शोध घेणे, अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करत गुन्हेगारांना अटक करणे याद्वारे आपला देश लक्ष्य वेगाने साध्य करत आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांमुळे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण जवळपास 100%नी वाढले आहे आणि या प्रकरणांतील गुन्हेगारांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 152%नी वाढ झाली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2006 ते 2013 या कालावधीत 1257 गुन्ह्यांची नोंद झाली असून ही संख्या 2014-2023 या कालावधीत तिपटीने वाढून 3755 वर पोहोचली आहे.

अँमली

2006-13 या कालावधीमधील अटक झालेल्यांच्या 1363च्या तुलनेत, 2014-23 या कालावधीमध्ये अटकेच्या प्रमाणात चौपट वाढ होऊन ही संख्या 5745पर्यंत पोहोचली आहे. 2006-13 या कालावधीत जप्त केलेल्या 1.52 लाख किलो अंमली पदार्थांच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण दुपटीने वाढून 3.95 लाख किलो इतके झाले आहे. मोदी सरकारच्या काळात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 2006-13 या कालावधीतील 768 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 पटीने वाढून 22,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जून 2023पर्यंत, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-NCBने अशा 23 प्रकरणांमध्ये आर्थिक तपास करुन, 74,75,00,531 रुपये किंमतीची मालमत्ता गोठवली आहे.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content