Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरीमंत्रिमंडळातील समावेशावरून रंगणार...

मंत्रिमंडळातील समावेशावरून रंगणार नाराजीनाट्य…

महायुतीला राज्यातील जनतेने अभूतपूर्व यश दिल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीतील तीनही पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाल्यानंतर सोमवारपासूनच त्या संभाव्य नाराजीनाट्याची झलक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिसून आली.

मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी थेट त्यांचे तारणहार असलेल्या नितीन गडकरींची भेट घेतली आणि गाऱ्हाणं मांडलं. त्याचवेळी विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दावा केला की मुनगंटीवार ज्येष्ठ नेते असून ते नाराज नाहीत. पक्ष आणि सरकार दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळे केंद्रीय पक्षाने काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. गडकरी यांना भेटून आल्यावर मुनगंटीवार यांनी मात्र आपले नाव केंद्राकडे पाठवलेल्या यादीत असताना वगळले कसे गेले, हा सवाल केला.

नाराजी

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही सारं काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही. मंत्रिमंडळातून वगळल्याचा धक्का बसलेले छगन भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. माध्यमप्रतिनिधींच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, होय मी नाराज आहे. त्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललात का, असे पत्रकारांनी विचारताच भुजबळ उत्तरले, मी कशाला कुणाला विचारायला जाऊ. भुजबळ यांनी नागपूरमधून थेट नाशिकला प्रयाण केल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते.

नाराजी

एकनाथ शिन्दे यांच्या शिवसेनेतही वेगळे चित्र नाही. मंत्रिमंडळ विस्तारातून वगळलेल्या मंत्र्यांनी नाराजी जाहीर करू नये, यासाठी शिन्दे आणि पवार यांच्या पक्षांमध्ये मंत्रिपदे अडीच वर्षांसाठीच असून नंतर पुन्हा खांदेपालट केला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह शिवसेनेतीलही काही आमदारांनी नाराजी अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांकडे बोलून दाखवली. भारतीय जनता पक्षाला प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी सतावणार असून संभाव्य नाराजीनाट्याची झलक सोमवारी विधिमंडळाच्या आवारातच बघायला मिळाली. ही नाराजी अधिवेशन संपेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून बघायला मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Continue reading

हिवाळी अधिवेशनाच्या सहलीतून जनतेला नेमके काय मिळाले?

नागपूर कराराचे पालन करण्याची संविधानिक जबाबदारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन राज्य सरकारने पूर्ण केली पण विदर्भाच्या सर्वसामान्य नागरिकांना या सहा दिवसांच्या कामकाजातून नेमके काय मिळाले, हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरितच राहिला. कापूस, सोयाबीनला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळतो का, विदर्भातील किंवा...

बीड सरपंचांच्या हत्त्येची एसआयटी तसेच न्यायालयीन चौकशी

बीडमध्ये झालेल्या संतोषअण्णा देशमुख या सरपंचाच्या हत्त्येप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांच्या एसआयटीद्वारे म्हणजेच विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी केली जाईल आणि या प्रकरणात गुन्हेगारीच्या इको-सिस्टिमसंदर्भात न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या दोन्ही चौकश्या तीन...

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो..

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.. महाराष्ट्रात सध्या राजकारणात काय चाललंय समजत नाही, कोण कुणाबरोबर जाईल आणि कोण नेमके कोणत्या पक्षात आहे, हे समजत नाही, अशी स्थिती आहे, ही तक्रार बरेचजण करतात. पण, मुळात गुंतागुंतीचे...
Skip to content