Homeमुंबई स्पेशलराष्ट्रवादीतली खदखद पुन्हा...

राष्ट्रवादीतली खदखद पुन्हा चव्हाट्यावर!

मला विरोधी पक्षनेतेपदामध्ये कधीही स्वारस्य नव्हते आणि आजही नाही. मला या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाच्या संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या… मी त्याला न्याय देईन, अशी जाहीर मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जालेल्या मेळाव्यातच केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधली खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याचे बोलले जाते.

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीचा वर्धापनदिनाचा मेळावा पार पडला. त्यात ते बोलत होते. आमदारांच्या आग्रहाखातर आपण विरोधी पक्षनेता झालो, असेही ते म्हणाले. शिवाजीपार्कची सभा झाली. त्यावेळी आम्ही पस्तीशीत होतो. त्यावेळी आम्ही ज्युनिअर म्हणून ओळखले जात होतो. या कालावधीत अनेकजण आले आणि सोडून गेले. दर २५ वर्षांनी नवी पिढी पुढे येत असते. मधल्या काळात भाकरी फिरवली पाहिजे असे सांगितले गेले. पक्षाने लहानात लहान कार्यकर्त्याला संधी दिली आहे. बरेच जण मंत्री होतात. परंतु ते स्वतःव्यतिरिक्त इतर कोणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकत नाहीत. त्यांनी काम करायला हवे. भाषणे देऊन पहिला नंबर येणार नाही, असेही अजितदादा म्हणाले.

राष्ट्रवादीच्या हातात एकहाती सत्ता का नाही? इतर नेत्यांपेक्षा शरद पवार उजवे आहेत. तरीही आपण का कमी पडलो? मुंबईत सर्वात कमी आपण आहोत. मुंबईत अद्यापही अध्यक्ष नाही. मुंबईत पक्ष का वाढला नाही याचादेखील विचार केला पाहिजे. अनेक ठिकाणी संघटनात्मक बदल झाले पाहिजेत. भाकरी फिरवावयाची झाली तर फिरलीच पाहिजे. नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नुकतेच दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली. या पदांवर त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नेमणूक केली. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. या सर्व घटनेनंतर अजित पवार नाराज नाहीत, असे शरद पवारांनी सांगितले होते. अजित पवार यांनीही आपण नाराज नसल्याचे सांगितले होते. पण आज अजित पवार यांनी मनातील खंत बोलून दाखवली. जयंत पाटील गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येक तीन वर्षांनंतर पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या भूमिकेनंतर शरद पवार कोणते पाऊल टाकतात, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content