Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती...

मुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती दडपली?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडपली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीची प्रत्यक्ष कागदपत्रांसमोर/करारपत्रांबरोबर पडताळणी केली असता हे साफ दिसून येत आहे, अशी तक्रार  भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी आयकर विभागाकडे केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दडपलेल्या संपत्तीसंदर्भात निवडणूक आयोग, दिल्ली येथे तक्रार दाखल केल्यानंतर आज 8 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेशन विंगच्या महासंचालक भानुमती यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदीमूल्य रू. 4,37,00,000 दाखवले आहे. पण करारामध्ये बाजारमूल्य रु. 4,14,00,000 असल्याचे दिसून येते. परंतूखरेदी मूल्य रु.2,10,00,000 असल्याचे दिसून येते. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 घरांचा (एकूण 23,500 स्क्वे. फूट बांधकाम)8 वर्षांचा (1/4/2013 ते 31/3/2021पर्यंत) प्रॉपर्टी टॅक्स/कर 12 नोव्हेंबर 2020 रोजी भरला. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार एकूण संपत्तीचे बाजारमूल्य रु. 5,29,00,000 आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर्लाई, अलिबाग येथे रु. 10.50 कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे. पण सांपत्ती/मालमत्तेची किंमत व मूल्य रु. 2.10 कोटी एवढीच दाखवली आहे, असे सोमैया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content