Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती...

मुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती दडपली?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडपली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीची प्रत्यक्ष कागदपत्रांसमोर/करारपत्रांबरोबर पडताळणी केली असता हे साफ दिसून येत आहे, अशी तक्रार  भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी आयकर विभागाकडे केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दडपलेल्या संपत्तीसंदर्भात निवडणूक आयोग, दिल्ली येथे तक्रार दाखल केल्यानंतर आज 8 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेशन विंगच्या महासंचालक भानुमती यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदीमूल्य रू. 4,37,00,000 दाखवले आहे. पण करारामध्ये बाजारमूल्य रु. 4,14,00,000 असल्याचे दिसून येते. परंतूखरेदी मूल्य रु.2,10,00,000 असल्याचे दिसून येते. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 घरांचा (एकूण 23,500 स्क्वे. फूट बांधकाम)8 वर्षांचा (1/4/2013 ते 31/3/2021पर्यंत) प्रॉपर्टी टॅक्स/कर 12 नोव्हेंबर 2020 रोजी भरला. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार एकूण संपत्तीचे बाजारमूल्य रु. 5,29,00,000 आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर्लाई, अलिबाग येथे रु. 10.50 कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे. पण सांपत्ती/मालमत्तेची किंमत व मूल्य रु. 2.10 कोटी एवढीच दाखवली आहे, असे सोमैया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content