Homeकल्चर +नीला भागवत, इला...

नीला भागवत, इला भाटे, वनिता खरात आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगकर्मींना वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकारांना हा पुरस्कार देण्यात  येतो. यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे वितरण शुक्रवार, २६ जानेवारी २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या गोखले सभागृहात होईल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये नीला भागवत, इला भाटे, वनिता खरात, नीरज शिरवईकर, शशिकला कैकिणी आदींचा समावेश आहे.

यंदा संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार शशिकला कैकिणी यांना तर ज्येष्ठ कलाकार पुरस्कार नीला भागवत यांना देण्यात येईल. ज्येष्ठ रंगकर्मी हा पुरस्कार इला भाटे यांना आणि उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक हा पुरस्कार नीरज शिरवईकर यांना देण्यात येईल. उत्कृष्ट प्रवासवर्णन पुस्तकाचा पुरस्कार रवि वाळेकर यांना ‘इजिप्सी‘ या पुस्तकासाठी देण्यात येईल. उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हा पुरस्कार वनिता खरात यांना तर संगीत-नाट्य रंगभूमीवरील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार डॅा. गौरी पंडित यांना देण्यात येईल.

संगीत विशारद या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षेत दादर-माटुंगा भागातून प्रथम क्रमांक मिळवणारे डॅा. प्रबोध चोबे आणि अदिती करंबेळकर यांना पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार वितरणानंतर ‘नायजेरियावर बोलू काही’ हा नायजेरियाच्या वास्तव्यातील रंजक किस्से सांगणारा मेधा अलकरी यांचा दृक्श्राव्य कार्यक्रम होईल.

अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content