Monday, May 12, 2025
Homeटॉप स्टोरीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त केंद्र...

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद!

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली उत्साहाची भावना आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने देशातील केंद्र सरकारच्या आस्थापना अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील.

अयोध्येत होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासोबतच त्याच वेळी भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी विविध संघटना आणि समुदायांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या संपूर्ण सोहळ्याच्या थेट प्रसारणाची व्यवस्था राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने केली आहे, जे प्रसारण विविध खाजगी टीव्ही वाहिन्यांवरूनही थेट दाखवले जाणार आहे. अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यांवर पाहण्यासाठी भारतात आणि परदेशात सार्वजनिक ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content