मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्या मुंबईतले पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले. त्यात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह-लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग–सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजस्य करार केले आहेत. यातून केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञानातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील. अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूकसुविधांची सरंचना चांगल्या रितीने...
वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात...
गेल्या दोन दिवसांपासून बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने थायलंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल श्रीलंकेला पोहोचले. श्रीलंका दौऱ्यावरून परतताना उद्या ते थेट रामनवमीच्या निमित्ताने...
पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून...
लक्षवेधी सूचनांच्या विषयावरून झालेल्या गदारोळाच्या वेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार निलेश राणे यांच्यात तूतू-मैमै झाली. भास्कर जाधव तालिका अध्यक्षांची परवानगी घेऊन बोलत असताना...
मोहम्मद शमी सच्चा मुसलमान आहे का? हा प्रश्न काल दिवसभर समाजमाध्यमांवर चघळला जात होता. निमित्त होते ते सध्या सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स...
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना काल डच्चू दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता नसल्याचे माहितगारांनी सांगितले....
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारसाठी गले की हड्डी बनलेला विषय, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे संपुष्टात आला आहे. पण,...
मुंबईत आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे धारेवर धरतात याची जनतेला अपेक्षा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार...