Homeबॅक पेजदारू पिऊन धिंगाणा...

दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

नाशिकच्या गंगापूर रोडवर काल मध्यरात्री भररस्त्यात धिंगाणा घालत पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या युवक, युवतीवर गंगापूर पोलिसांनी अखेर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या संबंधित व्हिडीओमुळे पोलिसांची प्रतिमा मालिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे. त्यांच्याजागी जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ एक क्लबमधून नाईट पार्टी करून दारूच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्तीपथक दाखल झाले. यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली. या युवतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली. मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली. तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर साळवे (30) रा. पवन नगर, सिडको, वैशाली वाघमारे, नाशिकरोड, भूमी ठाकूर (19) भाभा नगर, आलटमश शेख, वडाळा गाव, दोन बाऊन्सर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित हॉटेल चालकावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content