Homeचिट चॅटसीए अर्पित काबरा...

सीए अर्पित काबरा ब्रिटिश संसदेत सन्मानित

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC)चे अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांना ब्रिटिश संसदेतर्फे लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

अर्पित काबरा मूळचे राजस्थानच्या अजमेरचे. सध्या ते मुंबईत राहतात. फॉरेन्सिक ऑडिटिंगद्वारे त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रदान करण्यात आला. तरुण वयात, अर्पित

काबरा यांनी ICAIच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले. महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न तसेच WIRCमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे ते या सन्मानासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, WIRCच्या टीमने मुंबईत सर्वात मोठ्या मानवी मोझॅकचा विश्वविक्रमही केला होता.

त्याच्या या कामगिरीने सीएंच्या जगतात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. अर्पित काबरा यांच्या अनुकरणीय कार्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा बेंचमार्क प्रस्थापित झाला आहे, ज्याने सामान्य नागरिकांपासून व्यावसायिक वर्तुळांपर्यंतच्या लोकांच्या विस्तृत स्पेक्ट्रमवर प्रभाव टाकला आहे. अर्पित काबरा यांनी त्यांचे हे यश आपल्या कुटुंबाला तसेच WIRCमधील टीमला समर्पित केले आहे.

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content