Homeचिट चॅटसीए अर्पित काबरा...

सीए अर्पित काबरा ब्रिटिश संसदेत सन्मानित

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC)चे अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांना ब्रिटिश संसदेतर्फे लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

अर्पित काबरा मूळचे राजस्थानच्या अजमेरचे. सध्या ते मुंबईत राहतात. फॉरेन्सिक ऑडिटिंगद्वारे त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रदान करण्यात आला. तरुण वयात, अर्पित

काबरा यांनी ICAIच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले. महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न तसेच WIRCमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे ते या सन्मानासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, WIRCच्या टीमने मुंबईत सर्वात मोठ्या मानवी मोझॅकचा विश्वविक्रमही केला होता.

त्याच्या या कामगिरीने सीएंच्या जगतात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. अर्पित काबरा यांच्या अनुकरणीय कार्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा बेंचमार्क प्रस्थापित झाला आहे, ज्याने सामान्य नागरिकांपासून व्यावसायिक वर्तुळांपर्यंतच्या लोकांच्या विस्तृत स्पेक्ट्रमवर प्रभाव टाकला आहे. अर्पित काबरा यांनी त्यांचे हे यश आपल्या कुटुंबाला तसेच WIRCमधील टीमला समर्पित केले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content