Homeपब्लिक फिगरमाऊलींच्या कृपेने आळंदीतच...

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याचा मानस होता. परंतु माऊलींनीच बोलावल्यामुळे आळंदी येथेच माऊलींसह विठ्ठल दर्शन घडले. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. यानिमित्ताने आळंदीकरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

त्या पुढे म्हणाल्या की, संगीताच्या माध्यमातून अनेक तरुण मुले-मुली आध्यात्म आणि वारकरी संप्रदायाशी जोडली जात आहेत. दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम यादृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. आपण सर्वजण गुरुकुल परंपरेतून वारकरी संप्रदायाची सेवा करत आहोत. माऊलींचे आपल्यावर आणि सरकारवरही आशीर्वाद आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार महायुती सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. विधानपरिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे माऊलींचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी विधानपरिषदेतून सातत्याने आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी पाठपुरावा केला. मीदेखील वैयक्तिक आणि शासनस्तरावर या कार्यासाठी प्रयत्नशील आहे. आपली बांधिलकी बळीराजाशी आहे. अलीकडील पूर, अतिवृष्टी व पीक नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. आळंदीच्या या आध्यात्मिक केंद्रातून त्याला सहकार्य, वात्सल्य आणि आपुलकीचा आधार मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत.

आजचे दर्शन माऊलींनी दिले असून आपण त्यांच्या चरणी सदैव नतमस्तक आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यास त्या सोडविण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमास आळंदी संस्थान समितीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, कबीरबाबा, अॅड. रोहिणी पवार, प्रकाश वाडेकर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भक्तगण उपस्थित होते.

Continue reading

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...
Skip to content