Wednesday, March 12, 2025
Homeबॅक पेज'भारत संजीवनी' ठरला...

‘भारत संजीवनी’ ठरला सर्वोत्कृष्ट सीएसआर उपक्रम

मायक्रोफायनान्स फर्मच्या भारत संजीवनी उपक्रमाला ‘बिल्डिंग इंडिया 2047 – टेक्नॉलॉजीज फॉर अ बेटर टुमॉरो’ या प्रतिष्ठेच्या शिखर परिषदेत नुकतेच गौरविण्यात आले.

चेन्नई, 19 फेब्रुवारी २०२४ – भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL’s) चा अग्रणी सीएसआर उपक्रम ‘भारत संजीवनी’ला आयआयटी मद्रासने ‘बिल्डिंग इंडिया 2047 – टेक्नॉलॉजीज फॉर अ बेटर टुमॉरो’ या त्यांच्या प्रतिष्ठेच्या शिखर परिषदेत सर्वोत्कृष्ट सीएसआर उपक्रम म्हणून सन्मानित केले. ‘टेक्नॉलॉजी-ड्रिव्हन सोशल इम्पॅक्ट’ (तंत्रज्ञान प्रणीत सामाजिक प्रभाव) या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून, या पुरस्काराचे उद्दिष्ट ज्यांनी विस्तारीत आणि शाश्वत उपाय सुविधांद्वारे प्रचलित सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक उपाय सक्षम केले आहेत अशा कंपन्यांना सन्मानित करणे आहे.

तामिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा मंत्री डॉ. पलानिवेल थियागा राजन यांनी टीटीजे सभागृह, आयआयटी मद्रास येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य जन अधिकारी आणि सीएसआर प्रमुख किशोर सांबासिवम यांना पुरस्कार प्रदान केला.

भारत संजीवनी हा अनोखा आणि स्वदेशी सीएसआर उपक्रम ग्रामीण शेतकऱ्यांच्या दाराशी पशुधनाची काळजी कशी घ्यावी याची सेवा पुरवितो. ‘डॉक्टर-अॅट-डोअरस्टेप’ दृष्टीकोन अशा प्रकारचा पहिला मोबाइल ॲप-आधारित प्लॅटफॉर्म वापरतो. यावर कोणताही शेतकरी टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतो आणि एका निर्धारित कालमर्यादेत पशुधन उपचार, आपत्कालीन काळजी, लसीकरण, कृत्रिम फलन आणि पोषण यासाठी पात्र सेवा मिळवू शकतो. एकात्मिक आयटी प्लॅटफॉर्म आणि डॉक्टर आणि पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वापरलेले मोबाइल ॲप वेळेवर आणि परिश्रमपूर्वक सेवांमध्ये मदत करते. पशुधन मालक आणि संबंधित उपजीविकेच्या उत्पन्नाला आधार देण्यासाठी या उपक्रमाचा जन्म झाला. हा उपक्रम गुणवत्तेची कमतरता आणि वेळेवर काळजी घेण्याच्या मुख्य समस्येचे निराकरण करतो. त्यामुळे उत्पन्नावर लक्षणीय परिणाम होतो आणि संभाव्य जीवितहानी टळते.

या कामगिरीवर भाष्य करताना, भारत फायनान्शिअल इन्क्लूजन लिमिटेडचे​​मुख्य जन अधिकारी आणि सीएसआर प्रमुख किशोर सांबशिवम म्हणाले की, आयआयटी मद्रास (प्रमुख आयआयटी पैकी एक) कडून हा पुरस्कार मिळवणारे पहिलेच असल्यामुळे BFILमध्ये आम्हाला खूपच सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. २०१६मध्ये स्थापन झालेल्या भारत संजीवनीने ७ राज्यांमधील १५ लाखांहून अधिक शेतकरी आणि २० लाखांहून अधिक पशुधनांची सेवा केली आहे. गुरेढोरे आजारी पडल्यास गुरांना उपचारासाठी नेण्यात वाहतुकीवर मोठा खर्च येतो. अशा संकटकाळात या उपक्रमाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आम्ही भारतातील इतर राज्यांमध्ये हा उपक्रम वाढवण्यास उत्सुक आहोत.

आयआयटी मद्रासने दिलेली मान्यता भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडची कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकास यांच्याप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित करते.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content