Homeहेल्थ इज वेल्थभांडूपचे सावित्रीबाई फुले...

भांडूपचे सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह तात्पुरते बंद!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील भांडूप परिसरात असणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहाच्या दुरूस्तीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रसूतिगृह दुरूस्तीच्या कालावधीकरिता बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे.

मात्र, या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी या प्रसूतिगृहाचे स्थलांतर हे भांडूप परिसरातच असणाऱ्या नजीकच्या “सुषमा स्वराज प्रसूतिगृह, लालबहादूर शास्त्री मार्ग, भांडूप” येथे करण्यात आले आहे. प्रसूतीगृहाच्या इमारतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सुषमा स्वराज प्रसूतीगृह येथूनच आवश्यक त्या वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘एस’ विभागातील भांडूप (पश्चिम) येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतीगृहाची दुरूस्ती करण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनामार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार रूग्णांच्या सोयीसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतीगृहातील वैद्यकीय सेवा जवळच्या सुषमा स्वराज प्रसूतीगृह, लाल बहादूर शास्त्री, भांडूप येथून नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत, याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात द्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content