Thursday, February 6, 2025
Homeमुंबई स्पेशलभाई जगतापांना नारळ!...

भाई जगतापांना नारळ! वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा!!

लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांच्या जागी काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांनी आज याबाबतचे पत्र जारी केले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या प्रा. वर्षा गायकवाड चार वेळा राज्य विधानसभेवर निवडून आल्या आहेत. मुंबईतल्या धारावी मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. 2019 ते 2022 म्हणजेच मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या शालेय शिक्षण मंत्री होत्या. 2004पासून सतत चार वेळा त्या निवडून आल्या आहेत. साधारण पाच वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. गणितात एम.एस्सी. झालेल्या प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी बीएडसुद्धा केले आहे.

सध्या अशोक उर्फ भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला फार काही साध्य करता येणार नाही, या निर्णयापर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आल्यानंतर भाई जगताप यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली. दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसेच एकदा ते विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले आहेत. सध्या ते राज्य विधान परिषदेवर कार्यरत आहेत. कामगार नेते म्हणूनही त्यांनी सार्वजनिक जीवनात बराच काळ गाजवला. आजही काँग्रेसप्रणित काही कामगार संघटनांचे ते प्रतिनिधित्व करतात.

Continue reading

पुराणिक क्रिकेटः सुपर ओव्हरमध्ये फोर्ट यंगस्टर्सची राजावाडी क्लबवर मात

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत जान्हवी काटे व मानसी पाटील यांच्या अष्टपैलू खेळामुळे फोर्ट यंगस्टर्स संघाने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबवर...

कला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची स्पर्धा!

राज्यातल्या उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतल्या सर ज. जी. कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, जाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत....

गडचिरोली मलेरियामुक्तीसाठी 1 एप्रिलपासून होणार खास प्रयत्न

महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे....
Skip to content