Homeमुंबई स्पेशलभाई जगतापांना नारळ!...

भाई जगतापांना नारळ! वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा!!

लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांच्या जागी काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांनी आज याबाबतचे पत्र जारी केले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या प्रा. वर्षा गायकवाड चार वेळा राज्य विधानसभेवर निवडून आल्या आहेत. मुंबईतल्या धारावी मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. 2019 ते 2022 म्हणजेच मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या शालेय शिक्षण मंत्री होत्या. 2004पासून सतत चार वेळा त्या निवडून आल्या आहेत. साधारण पाच वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. गणितात एम.एस्सी. झालेल्या प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी बीएडसुद्धा केले आहे.

सध्या अशोक उर्फ भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला फार काही साध्य करता येणार नाही, या निर्णयापर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आल्यानंतर भाई जगताप यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली. दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसेच एकदा ते विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले आहेत. सध्या ते राज्य विधान परिषदेवर कार्यरत आहेत. कामगार नेते म्हणूनही त्यांनी सार्वजनिक जीवनात बराच काळ गाजवला. आजही काँग्रेसप्रणित काही कामगार संघटनांचे ते प्रतिनिधित्व करतात.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content