Homeमुंबई स्पेशलमुंबईत गोरख चिंचेला...

मुंबईत गोरख चिंचेला येणार अच्छे दिन!

मुंबईतल्या आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून काल, रविवारी तत्काळ काढून टाकण्यात आले. याऊलट पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक आळे (Tree Basin) बनवून त्यात मातीदेखील टाकण्यात आली.

महापालिकेच्या एच पश्चिम विभागातून हटविण्यात आलेल्या पुरातन गोरख चिंचेच्या झाडाच्या बदल्यात पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये नव्याने गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण केले जात आहे. मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा उद्यान विभाग सतत विविध उपक्रम राबवित असते.

गोरख चिंच

उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या निर्देशानुसार या महानगरातील उद्यानांमध्ये विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण आणि जतन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून रविवारी आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम काढून टाकण्यात आले. याशिवाय उद्यान विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत या झाडाच्या बुंध्याशी मोठे आळे (Tree Basin) बनवून त्यात मातीदेखील टाकली. त्यामुळे या झाडाचे आयुष्य वाढणार आहे. तसेच पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठीदेखील याची मदत होणार आहे.

अनेक उद्यानांत होणार गोरख चिंचेच्या रोपांचे  रोपण

एच पश्चिम विभागातील पुरातन गोरख चिंचेच्या झाडाचेंदेखील रोपण पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. उद्यान विभागाने पालिकेच्या विविध उद्यानांचीही निवड केली असून त्यात गोरख चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्याकरिता १० ते १५ वर्षांची मोठी रोपे मागविण्यात आली आहेत. परंतु सध्या उष्मा जास्त असल्याने पुढील एक ते दोन आठवड्यात एच पश्चिम विभागातील विविध उद्यानात त्यांचे रोपण करण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. 

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content