Homeटॉप स्टोरी‘अन्वय नाईक’ची १९...

‘अन्वय नाईक’ची १९ घरे उद्धव ठाकरेंकडे?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने २१ मार्च २०१४ला अन्वय नाईक परिवाराकडून अलिबागजवळच्या कोलेई गावातल्या ३० जमिनी विकत घेतल्या. यावर पाच कोटींच्या किमतीची १९ घरे होती. या घरांची मालकी नेमकी कोणाची, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी आज केला.

किरीट सोमैया यांनी आज कोर्लई गावात जाऊन याबाबत अधिक माहिती घेतली. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते इत्यादी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायततलाठी/तहसीलदारच्या रेकॉर्डवरून काही प्रश्न त्यांनी नंतर उपस्थित केले.

१२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे परिवार, रविंद्र वायकर परिवार आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक/जमिनीचे व्यवहार यासंबंधीची माहिती दिली होती. अन्वय नाईक यांच्या या ३० जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार २१ मार्च २०१४ रोजी पूर्ण झाला. त्याचे अ‍ॅग्रिमेंट, ट्रान्सफरव सगळे पेपरवर्क पूर्ण झाले. परंतु, या जमिनीवर १९ घरे, ज्यांचे बांधकाम ५५० चौरस फुटांपासून २५०० चौरस फुटापर्यंतचे होते/आहेत, असे ठाकरे व नाईक परिवाराची कागदपत्रे पाहता दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की २००९-१०पासून ही घरे त्या जमिनीवर अस्तित्त्वात आहेत. या १९ घरांचे एकूण बांधकाम २३५०० चौरस फूट आहे. याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडी रेकनर रेटप्रमाणे पाच कोटी २९ लाख रूपये मूल्य आहे. २१ मार्च २०१४ रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या. परंतु १३ नोव्हेंबर २०२०पर्यंत म्हणजेच आम्ही हे जाहीर करेपर्यंत ही घरे कै. अन्वय नाईक यांच्या नावाने ग्रामपंचायतीत होती, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच कोटींची ही १९ घरे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल्याचे दिसत नाही. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना २०१९-२०, २०-२१चे जे प्रोसिडींग बूक, फॉर्म ८ व अन्य रेकॉर्ड्स आहेत त्यात स्पष्टता नाही. त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या याच्या अधिकृत तपशीलात गोंधळ दिसत आहे. ग्रामपंचायतीत ही १९ घरे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी असा ठराव ७ जून २०१९च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे. परंतु, तो व्यवहार अधिकृत १२ नोव्हेंबर २०२०नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी आम्हाला सांगितले. याचा अर्थ अन्वय नाईक यांची १९ घरे ठाकरे परिवार २०१४ ते २०२० म्हणजे सहा वर्षे बेनामी संपत्ती म्हणून ठेवून होते का, असा सवालही सौमैया यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांचा मृत्यू २०१८मध्ये झाला. परंतु, उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरे करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार २०२० नोव्हेंबरमध्ये किंवा त्या काळामध्ये झाला. याची कायदेशीर स्थिती काय? असा व्यवहार करण्यासाठी कै. अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या अर्थिक संबंधांविषयी स्पष्टता करावी, अशी मागणीही भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content