Homeटॉप स्टोरी‘अन्वय नाईक’ची १९...

‘अन्वय नाईक’ची १९ घरे उद्धव ठाकरेंकडे?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने २१ मार्च २०१४ला अन्वय नाईक परिवाराकडून अलिबागजवळच्या कोलेई गावातल्या ३० जमिनी विकत घेतल्या. यावर पाच कोटींच्या किमतीची १९ घरे होती. या घरांची मालकी नेमकी कोणाची, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी आज केला.

किरीट सोमैया यांनी आज कोर्लई गावात जाऊन याबाबत अधिक माहिती घेतली. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते इत्यादी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायततलाठी/तहसीलदारच्या रेकॉर्डवरून काही प्रश्न त्यांनी नंतर उपस्थित केले.

१२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे परिवार, रविंद्र वायकर परिवार आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक/जमिनीचे व्यवहार यासंबंधीची माहिती दिली होती. अन्वय नाईक यांच्या या ३० जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार २१ मार्च २०१४ रोजी पूर्ण झाला. त्याचे अ‍ॅग्रिमेंट, ट्रान्सफरव सगळे पेपरवर्क पूर्ण झाले. परंतु, या जमिनीवर १९ घरे, ज्यांचे बांधकाम ५५० चौरस फुटांपासून २५०० चौरस फुटापर्यंतचे होते/आहेत, असे ठाकरे व नाईक परिवाराची कागदपत्रे पाहता दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की २००९-१०पासून ही घरे त्या जमिनीवर अस्तित्त्वात आहेत. या १९ घरांचे एकूण बांधकाम २३५०० चौरस फूट आहे. याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडी रेकनर रेटप्रमाणे पाच कोटी २९ लाख रूपये मूल्य आहे. २१ मार्च २०१४ रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या. परंतु १३ नोव्हेंबर २०२०पर्यंत म्हणजेच आम्ही हे जाहीर करेपर्यंत ही घरे कै. अन्वय नाईक यांच्या नावाने ग्रामपंचायतीत होती, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच कोटींची ही १९ घरे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल्याचे दिसत नाही. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना २०१९-२०, २०-२१चे जे प्रोसिडींग बूक, फॉर्म ८ व अन्य रेकॉर्ड्स आहेत त्यात स्पष्टता नाही. त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या याच्या अधिकृत तपशीलात गोंधळ दिसत आहे. ग्रामपंचायतीत ही १९ घरे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी असा ठराव ७ जून २०१९च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे. परंतु, तो व्यवहार अधिकृत १२ नोव्हेंबर २०२०नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी आम्हाला सांगितले. याचा अर्थ अन्वय नाईक यांची १९ घरे ठाकरे परिवार २०१४ ते २०२० म्हणजे सहा वर्षे बेनामी संपत्ती म्हणून ठेवून होते का, असा सवालही सौमैया यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांचा मृत्यू २०१८मध्ये झाला. परंतु, उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरे करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार २०२० नोव्हेंबरमध्ये किंवा त्या काळामध्ये झाला. याची कायदेशीर स्थिती काय? असा व्यवहार करण्यासाठी कै. अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या अर्थिक संबंधांविषयी स्पष्टता करावी, अशी मागणीही भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content