Homeटॉप स्टोरी‘अन्वय नाईक’ची १९...

‘अन्वय नाईक’ची १९ घरे उद्धव ठाकरेंकडे?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने २१ मार्च २०१४ला अन्वय नाईक परिवाराकडून अलिबागजवळच्या कोलेई गावातल्या ३० जमिनी विकत घेतल्या. यावर पाच कोटींच्या किमतीची १९ घरे होती. या घरांची मालकी नेमकी कोणाची, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी आज केला.

किरीट सोमैया यांनी आज कोर्लई गावात जाऊन याबाबत अधिक माहिती घेतली. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते इत्यादी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायततलाठी/तहसीलदारच्या रेकॉर्डवरून काही प्रश्न त्यांनी नंतर उपस्थित केले.

१२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे परिवार, रविंद्र वायकर परिवार आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक/जमिनीचे व्यवहार यासंबंधीची माहिती दिली होती. अन्वय नाईक यांच्या या ३० जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार २१ मार्च २०१४ रोजी पूर्ण झाला. त्याचे अ‍ॅग्रिमेंट, ट्रान्सफरव सगळे पेपरवर्क पूर्ण झाले. परंतु, या जमिनीवर १९ घरे, ज्यांचे बांधकाम ५५० चौरस फुटांपासून २५०० चौरस फुटापर्यंतचे होते/आहेत, असे ठाकरे व नाईक परिवाराची कागदपत्रे पाहता दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की २००९-१०पासून ही घरे त्या जमिनीवर अस्तित्त्वात आहेत. या १९ घरांचे एकूण बांधकाम २३५०० चौरस फूट आहे. याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडी रेकनर रेटप्रमाणे पाच कोटी २९ लाख रूपये मूल्य आहे. २१ मार्च २०१४ रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या. परंतु १३ नोव्हेंबर २०२०पर्यंत म्हणजेच आम्ही हे जाहीर करेपर्यंत ही घरे कै. अन्वय नाईक यांच्या नावाने ग्रामपंचायतीत होती, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच कोटींची ही १९ घरे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल्याचे दिसत नाही. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना २०१९-२०, २०-२१चे जे प्रोसिडींग बूक, फॉर्म ८ व अन्य रेकॉर्ड्स आहेत त्यात स्पष्टता नाही. त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या याच्या अधिकृत तपशीलात गोंधळ दिसत आहे. ग्रामपंचायतीत ही १९ घरे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी असा ठराव ७ जून २०१९च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे. परंतु, तो व्यवहार अधिकृत १२ नोव्हेंबर २०२०नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी आम्हाला सांगितले. याचा अर्थ अन्वय नाईक यांची १९ घरे ठाकरे परिवार २०१४ ते २०२० म्हणजे सहा वर्षे बेनामी संपत्ती म्हणून ठेवून होते का, असा सवालही सौमैया यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांचा मृत्यू २०१८मध्ये झाला. परंतु, उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरे करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार २०२० नोव्हेंबरमध्ये किंवा त्या काळामध्ये झाला. याची कायदेशीर स्थिती काय? असा व्यवहार करण्यासाठी कै. अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या अर्थिक संबंधांविषयी स्पष्टता करावी, अशी मागणीही भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content