Homeबॅक पेज.. आणि तटरक्षक...

.. आणि तटरक्षक दलाने वाचवले मच्छिमाराचे प्राण!

केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे 40 सागरी मैलांवरील जझिरा, या भारतीय मच्छिमार नौकेवरील गंभीर आजारी मच्छिमाराची भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच सुटका केली.

समुद्रात पडून वाहून जात असलेल्या या मच्छिमाराचे प्राण नौकेवरील खलाशांनी वाचवले होते, मात्र फुफ्फुसात जास्त पाणी गेल्याने त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर मच्छिमार नौकेने वैद्यकीय मदतीसाठी दिलेल्या आपत्कालीन हाकेला भारतीय तटरक्षक दलाने प्रतिसाद दिला आणि कोची येथून आर्यमन आणि C-404 जहाजे, तसेच वैद्यकीय पथकासह हलकी प्रगत हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी रवाना केली.

भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या मच्छिमार नौकेचा शोध घेतला आणि नौकेवरील रुग्णाला हवाईमार्गे कोची येथे नेले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने ‘वयम् रक्षामा’ या आपल्या ब्रीदवाक्याला अनुसरून जलद आणि तत्परतेने समन्वय साधल्याने समुद्रामध्ये मृत्यूशी झुंजत असलेल्या मच्छिमाराचे प्राण वाचले. 

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content