Homeचिट चॅटकुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला आणि द्वितीय श्रेणी गटात पंढरीनाथ सेवा मंडळ, चुनाभट्टी या संघांनी विजेतेपदाचा मान मिळविला.

प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अंबिकाने चुनाभट्टी येथील भानवे अकादमीचा ३० विरुध्द १४ गुणांनी आरामात पराभव केला. विजयी संघाच्या शुभम दिडवाघने तुफानी चढाया केल्या. तर भानवेच्या करणसिंगने झकास पकडी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांची स्पर्धेतील अनुक्रमे सर्वोत्तम चढाई आणि पकडपटू म्हणून निवड‌‌ करण्यात आली. व्दितीय श्रेणी पुरुष गटाचे‌ जेतेपद मिळवताना पंढरीनाथने कुर्ला येथील हनुमान क्रीडा मंडळाचा २८ विरुध्द ५ गुणांनी दणदणीत पराभव केला.

विजयी संघाचा ओमकार कदम चमकला. पराभूत संघाच्या सौरभ घागची लढत एकाकी ठरली. त्याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिकाने शूर संभाजीचा तर भानवेने शितलादेवीचा पराभव केला. व्दितीय श्रेणी पुरुष गटात अंतिम फेरी गाठताना पंढरीनाथने जाणता राजाचा आणि हनुमानने छावा बाॅईजचा पराभव केला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश देण्यात आला होता. विजेत्या, उपविजेत्या संघांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि आर्कषक चषक भेट देण्यात आले. स्पर्धेला कबड्डीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी अथक मेहनत घेतली.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content