Homeचिट चॅटकुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला आणि द्वितीय श्रेणी गटात पंढरीनाथ सेवा मंडळ, चुनाभट्टी या संघांनी विजेतेपदाचा मान मिळविला.

प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अंबिकाने चुनाभट्टी येथील भानवे अकादमीचा ३० विरुध्द १४ गुणांनी आरामात पराभव केला. विजयी संघाच्या शुभम दिडवाघने तुफानी चढाया केल्या. तर भानवेच्या करणसिंगने झकास पकडी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांची स्पर्धेतील अनुक्रमे सर्वोत्तम चढाई आणि पकडपटू म्हणून निवड‌‌ करण्यात आली. व्दितीय श्रेणी पुरुष गटाचे‌ जेतेपद मिळवताना पंढरीनाथने कुर्ला येथील हनुमान क्रीडा मंडळाचा २८ विरुध्द ५ गुणांनी दणदणीत पराभव केला.

विजयी संघाचा ओमकार कदम चमकला. पराभूत संघाच्या सौरभ घागची लढत एकाकी ठरली. त्याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिकाने शूर संभाजीचा तर भानवेने शितलादेवीचा पराभव केला. व्दितीय श्रेणी पुरुष गटात अंतिम फेरी गाठताना पंढरीनाथने जाणता राजाचा आणि हनुमानने छावा बाॅईजचा पराभव केला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश देण्यात आला होता. विजेत्या, उपविजेत्या संघांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि आर्कषक चषक भेट देण्यात आले. स्पर्धेला कबड्डीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी अथक मेहनत घेतली.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content