Homeचिट चॅटकुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला आणि द्वितीय श्रेणी गटात पंढरीनाथ सेवा मंडळ, चुनाभट्टी या संघांनी विजेतेपदाचा मान मिळविला.

प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अंबिकाने चुनाभट्टी येथील भानवे अकादमीचा ३० विरुध्द १४ गुणांनी आरामात पराभव केला. विजयी संघाच्या शुभम दिडवाघने तुफानी चढाया केल्या. तर भानवेच्या करणसिंगने झकास पकडी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांची स्पर्धेतील अनुक्रमे सर्वोत्तम चढाई आणि पकडपटू म्हणून निवड‌‌ करण्यात आली. व्दितीय श्रेणी पुरुष गटाचे‌ जेतेपद मिळवताना पंढरीनाथने कुर्ला येथील हनुमान क्रीडा मंडळाचा २८ विरुध्द ५ गुणांनी दणदणीत पराभव केला.

विजयी संघाचा ओमकार कदम चमकला. पराभूत संघाच्या सौरभ घागची लढत एकाकी ठरली. त्याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिकाने शूर संभाजीचा तर भानवेने शितलादेवीचा पराभव केला. व्दितीय श्रेणी पुरुष गटात अंतिम फेरी गाठताना पंढरीनाथने जाणता राजाचा आणि हनुमानने छावा बाॅईजचा पराभव केला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश देण्यात आला होता. विजेत्या, उपविजेत्या संघांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि आर्कषक चषक भेट देण्यात आले. स्पर्धेला कबड्डीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी अथक मेहनत घेतली.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content