Homeचिट चॅटकुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला आणि द्वितीय श्रेणी गटात पंढरीनाथ सेवा मंडळ, चुनाभट्टी या संघांनी विजेतेपदाचा मान मिळविला.

प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अंबिकाने चुनाभट्टी येथील भानवे अकादमीचा ३० विरुध्द १४ गुणांनी आरामात पराभव केला. विजयी संघाच्या शुभम दिडवाघने तुफानी चढाया केल्या. तर भानवेच्या करणसिंगने झकास पकडी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांची स्पर्धेतील अनुक्रमे सर्वोत्तम चढाई आणि पकडपटू म्हणून निवड‌‌ करण्यात आली. व्दितीय श्रेणी पुरुष गटाचे‌ जेतेपद मिळवताना पंढरीनाथने कुर्ला येथील हनुमान क्रीडा मंडळाचा २८ विरुध्द ५ गुणांनी दणदणीत पराभव केला.

विजयी संघाचा ओमकार कदम चमकला. पराभूत संघाच्या सौरभ घागची लढत एकाकी ठरली. त्याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिकाने शूर संभाजीचा तर भानवेने शितलादेवीचा पराभव केला. व्दितीय श्रेणी पुरुष गटात अंतिम फेरी गाठताना पंढरीनाथने जाणता राजाचा आणि हनुमानने छावा बाॅईजचा पराभव केला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश देण्यात आला होता. विजेत्या, उपविजेत्या संघांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि आर्कषक चषक भेट देण्यात आले. स्पर्धेला कबड्डीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी अथक मेहनत घेतली.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content