Homeपब्लिक फिगरचेंबूरच्या आंबेडकर उद्यानात...

चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात लवकरच तेवत राहणार अखंड भीमज्योत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत मुंबईत चेंबूरच्या भारतरत्न डॉ. आंबेडकर उद्यानात लवकरच उभारली जाणार आहे. आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येणार असून ही भीमज्योत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देत राहील.

चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महामानवाची जयंती साजरी केली जाते. राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. याठिकाणी भीमज्योत उभारावी, अशी मागणी काही महिन्यांपासून केली जात होती. खासदार शेवाळे यांनी याबाबत पाठपुरावा करून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करून घेतल्या होत्या. आता लवकरच चेंबूरमध्ये ही अखंड भीमज्योत उभारली जाणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या आंबेडकर जयंतीला या उद्यानात बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत हे नवे आकर्षण असणार आहे.

अशोक स्तंभ आणि भीमज्योत

चेंबूरचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आंबेडकरी अनुयायांसाठी आस्थेचे ठिकाण आहे. याठिकाणी आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार गेल्या वर्षी शेवाळे यांच्या पाठपुराव्याने अशोक स्तंभ उभारण्यात आला. आता लवकरच इथे भीमज्योतदेखील उभारली जाणार आहे.

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content