Homeबॅक पेजचेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः आकांक्षा, घुफ्रानची बाजी

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतल्या महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी मुंबईच्या रिंकी कुमारीला सहज नमवून विजेतेपद पटकाविले. तर, पुरुषांच्या अंतिम सामन्यात अनुभवाच्या जोरावर मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्याच विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये पहिला सेट ११-२५ हरल्यानंतरदेखील पुढील दोन सेट २५-११ व २५-१५ असे जिंकून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केले.

अंतिम सामन्यापूर्वी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मुंबई क्लस्टर १चे प्रमुख गुंजन सिंग यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी विकास धारियाने मुंबईच्या अमोल सावर्डेकरवर सहज मात केली. घुफ्रानने मुंबईच्या माजी विश्व्विजेत्या प्रशांत मोरेला कडव्या लढतीनंतर नमवले होते. महिलांमध्ये विजेत्या आकांक्षाने उपांत्य लढतीत मुंबईच्या नीलम घोडकेला तीन सेटमध्ये  हरविले. रिंकीने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अनुभवी राष्ट्रीय विजेत्या संगीता चांदोरकरला सहज नमवले.

विजेत्या खेळाडूंना चेंबूर जिमखान्याचे अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान, सल्लागार सुरिंदर शर्मा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक चेंबूरचे शाखाधिकारी मंदार चाचड, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मॅनेजर मोहित नारंग यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन कॅरम व बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहचिटणीस केतन चिखले, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण उपस्थित होते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content