Homeकल्चर +'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व' प्रकाशित

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित ‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’, या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले.

या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा आढावा घेण्यात आला आहे. संजीवनी खेर यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले तर विजय कुवळेकर यांनी पुस्तकाचे सखोल विश्लेषण केले. जागतिक साहित्यातील अभिजात साहित्याच्या शाश्वत वारशावर भर देत, त्यांच्या लेखकांच्या अनुभवांच्या समृद्धतेने या कलाकृतींना मोठ्या उंचीवर नेले आहे असे त्यांनी सांगितले. पूर्वी समाजात परिवर्तनाचे मोलाचे कार्य साहित्यकृतींनी केले आहे. त्यामुळे या साहित्यकृती आपण या पुस्तकातून समजून घेतल्या पाहिजेत, असे विचार दिनकर गांगल यांनी व्यक्त केले. अजरामर आणि अभिजात साहित्यिककृती उपयुक्त असून तिच्यातील समाजबदलाचे संदर्भ आजही आपल्याला अभ्यासता येतात. त्यामुळे अशा साहित्यकृतींना एकत्रित ठेवण्याची किमया साध्य करणारे हे पुस्तक निश्चितच पुढच्या पिढीसाठीही महत्त्वाचे आहे, असे कुमार केतकर म्हणाले.

वाचनाचा छंद आणि साहित्याची आवड यातून जगभरातील पुस्तकांच्या संपर्कात आलो. वाचन वाढत गेले आणि त्यातूनच मग जगभरातील मान्यवरांच्या पुस्तकांचा आढावा घेणारा हा ग्रंथ निर्माण करता आला, असे विचार लेखक राजीव श्रीखंडे यांनी मांडले. सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविकात ग्रंथालीविषयी आणि सध्याच्या उपक्रमांविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवर साहित्यिक रसिकांची एक सुरेख मैफल जमली होती.

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content