Homeपब्लिक फिगरआटपाडी नगरपंचायत होणार...

आटपाडी नगरपंचायत होणार नगर परिषद!

नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतऐवजी नगर परिषद करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांमधील  विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्री सांगली दौऱ्यावर होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर, सुमन पाटील यावेळी उपस्थित होते.

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे होणारे बदल लोकप्रतिनिधी व प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी विशेष सादरीकरण यावेळी करण्यात आले. बदललेल्या विकास नियंत्रण नियमावलीचे फायदे लोकांना मिळणार असून हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागवार कार्यशाळा घेण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.

जयंत पाटील यांनी आष्टा आणि ईस्लामपूर याबाबत पत्र लिहून केलेल्या सूचना नक्की पूर्ण करू असही त्यांनी स्पष्ट केले. विटा, तासगाव येतील पाणी पुरवठा पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी केल्या. त्यासोबतच पलुस पाणीपुरवठा योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच सोडवणार

आटपाडीमधील ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणारे प्रस्तावित नाट्यगृह आणि स्मारक जमीन अधिग्रहणामुळे रखडले आहे, याकडे आमदार अनिल बाबर यांनी लक्ष वेधले. त्यावर याबाबत नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, असे शिंदे म्हणाले. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गीतरामायणकार गदिमा हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...
Skip to content