Homeब्लॅक अँड व्हाईटमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट देण्यासारखे पुस्तक ‘छत्रपती शिवाजीमहाराज’!

छत्रपती शिवाजीमहाराज. प्रस्तुत चरित्र विद्यार्थ्यांकरिता लिहिले असून ते संशोधकीय पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवले आहे. एकूण १२ प्रकरणांतून महाराजांचे हे वाचनीय चरित्र मांडण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांनी अत्युत्कृष्ट प्रशासक आणि धडाडीचे सेनापती निर्माण केले. हिंदू हे, राष्ट्र निर्माण करू शकतात, त्या राष्ट्राच्या संरक्षणाकरिता सेना उभी करू शकतात, त्या राष्ट्राच्या कल्याणाकरिता व्यवस्था निर्माण करू शकतात, शेतकऱ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, व्यापार, उद्योगधंदे आणि अर्थव्यवस्था या गोष्टींना चालना देऊ शकतात, तसेच सागरी आक्रमकांना पायबंद घालण्यासाठी आरमार निर्माण करू शकतात; अशा सर्व गोष्टींची उदाहरणे शिवाजीमहाराजांनी स्वतःच्या कृतीतून घालून दिली आहेत.

भारतवर्षाचे नवनिर्माण करून दिल्ली जिंकण्याचे उच्चतम ध्येय शिवाजीमहाराजांनी मराठ्यांपुढे ठेवले. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला. तब्बल पंचवीस वर्षे जीवन-मरणाचा संघर्ष करून मराठ्यांनी हे राज्य वाचविले. अखेर पराभूत मानसिकतेत औरंगजेबाचा महाराष्ट्रातच मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर मुघल साम्राज्याचे अतिशय वेगाने पतन झाले. पुढे अठरावे शतक शिवाजीमहाराजांच्या राजकीय वारसदारांनी गाजविले. संपूर्ण देश मराठ्यांनी व्यापला. मराठ्यांची घोडी सिंधू, गंगा तसेच कावेरी नदीचे पाणी प्यायली. मराठ्यांनी ओडिसा जिंकून बंगालवर स्वाऱ्या केल्या आणि दिल्लीवरदेखील भगवा फडकविला. अटक ते कटक आणि कुमाऊँ ते कावेरी असे विशाल साम्राज्य मराठ्यांनी निर्माण केले. आधुनिक भारतालादेखील सर्वांगसुंदर बनविण्याचे बहुतांश श्रेय मराठ्यांनाच जाते आणि हे सर्व मराठे शिवाजीमहाराजांचेच अनुयायी आहेत.

भारताला सुजलाम् सुफलाम् बनविण्याचा पाया घालणाऱ्या शिवशाहीचा इतिहास डॉ. केदार फाळके यांनी या ग्रंथात संशोधकीय पद्धतीने मांडला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट देण्यासारखे हे पुस्तक आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज

लेखक: डॉ. केदार फाळके

मूल्य- १२० ₹. पृष्ठे- १२४

कुरिअर खर्च- ५० ₹.

छत्रपती

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)

Continue reading

अशी आहे रा. स्व. संघाची शतकी वाटचाल

संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०:...

.. आणि दिवाळी अंकाबाबत झालेली चर्चा फक्त चर्चाच राहिली!

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे...

वाचनीय, चिंतनीय व संग्राह्य असे ‘मृत्युंजय भारत’!

'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला.‌ हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य 'भैयाजी' जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे. व्याख्यानांचे विषय- १) राष्ट्रीय...
Skip to content