HomeArchiveरसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी...

रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

Details
रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

आज किसानदिनानिमित्त आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे, याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर” होश किसान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

 
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘होश वॉकेथॉन’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कॅन्सर पेशंट्ससह खासदार राहुल शेवाळे आणि ‘अंबागोपाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी.

दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायनं या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा याकरीता रविवारी सकाळी “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 10 हजार लोकांनी तसंच मावळमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला. यासोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य करू असा निर्धार हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटलमधील गुणवंती संघवी या कँसर पीडितेने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

आज किसानदिनानिमित्त आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे, याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर” होश किसान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

 
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘होश वॉकेथॉन’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कॅन्सर पेशंट्ससह खासदार राहुल शेवाळे आणि ‘अंबागोपाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी.

दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायनं या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा याकरीता रविवारी सकाळी “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 10 हजार लोकांनी तसंच मावळमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला. यासोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य करू असा निर्धार हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटलमधील गुणवंती संघवी या कँसर पीडितेने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.”
 

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content