Details
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – खा. राहुल शेवाळे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. एका पत्रकाद्वारे केलेल्या या मागणीत शेवाळे यांनी आण्णाभाऊंचे कार्य हे देशभरातील शोषितांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख केला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णाभाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.
35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सरकारने त्यांना अभिवादन करावे, अशी माझी मागणी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो
कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. एका पत्रकाद्वारे केलेल्या या मागणीत शेवाळे यांनी आण्णाभाऊंचे कार्य हे देशभरातील शोषितांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख केला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णाभाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.
35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सरकारने त्यांना अभिवादन करावे, अशी माझी मागणी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”

